ऊर्जा मंत्री म्हणाले वीजबिल भरावेच लागेल, आता वडेट्टीवार म्हणतात, लोकांच्या भावना तीव्र, मंत्रिमंडळात चर्चा करु

लोकांच्या भावना तीव्र आहेत. लोक आम्हाला भेटून निवेदने देत आहेत. त्यामुळे उर्जा खात्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा होईल. | Vijay Wadettiwar

ऊर्जा मंत्री म्हणाले वीजबिल भरावेच लागेल, आता वडेट्टीवार म्हणतात, लोकांच्या भावना तीव्र, मंत्रिमंडळात चर्चा करु
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 3:34 PM

नागपूर: लॉकडाऊनच्या काळातील विजेची बिलं (electricity bill) माफ केली जाणार नाहीत, असे सांगत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सामान्यांना शॉक दिल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नवे वक्तव्य करून संभ्रम आणखीनच वाढवला आहे. (Vijay Wadettiwar on increased electricity bill issue)

उर्जा विभागाच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल. लोकांवर अन्याय झाला असेल तर चर्चा होणे आवश्यक आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यामुळे आता जनतेचा रोष टाळण्यासाठी महाविकासआघाडी सरकार वीज बिल कमी करण्याचा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वीजबिल माफी होणारच नाही, या निर्णयावर एकप्रकारे फेरविचार करण्याचे संकेत दिले. लोकांच्या भावना तीव्र आहेत. लोक आम्हाला भेटून निवेदने देत आहेत. त्यामुळे उर्जा खात्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा होईल. लोकांवर अन्याय होत असेल, काही चुकीचं होत असेल तर त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे.

50 टक्के लोकांनी बिल भरले आहे. त्यामुळे आता केवळ उर्वरित 50 टक्के लोकांचा प्रश्न आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाला मदत केली. त्याप्रमाणे गरज पडल्यास वाढीव वीज बिलाचा भुर्दंड सोसाव्या लागणाऱ्या लोकांनाही मदत झाली पाहिजे, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

‘शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी भाजपची नीती’ महाराष्ट्रावर (Maharashtra) सगळ्यात मोठं संकट असताना केंद्र सरकार (central government) राज्यासोबत दुजभाव करत असल्याची टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला मते दिली नाहीत का? मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे (bjp) खासदार राज्यात निवडून आले. राज्यातही जनतेनं त्यांचे 105 आमदार निवडून दिले. पण तरीही भाजपने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे धोरण अवलंबल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

संबंधित बातम्या:

Pravin Darekar | वीज बिल माफीच्या आश्वासनाचे काय झालं? प्रवीण दरेकरांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल

श्रेयवादाच्या लढाईत वीज बिलमाफी अडकली?, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्र्यांची फाईल फेटाळत असल्याचा बावनकुळेंचा आरोप

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान

(Vijay Wadettiwar on increased electricity bill issue)

Non Stop LIVE Update
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.