AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धातील मृतदेह कोण आणि कसे मोजतात? पद्धत काय?

नवी दिल्ली: पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारतात दहशतवाद्यांच्या मृतांच्या आकडेवारीवरुन घाणेरडं राजकारण सुरु आहे. सुरुवातील तीनशे ते साडेतीनशे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यांचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर शरद पवारांसह विरोधकांनी हल्ल्यातील मृतांचा नेमका आकडा सांगा, अशी मागणी केली. तर भाजप अध्यक्ष अमित शाहांनी अडीचशे दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाचे प्रमुख एअर चीफ […]

युद्धातील मृतदेह कोण आणि कसे मोजतात? पद्धत काय?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

नवी दिल्ली: पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारतात दहशतवाद्यांच्या मृतांच्या आकडेवारीवरुन घाणेरडं राजकारण सुरु आहे. सुरुवातील तीनशे ते साडेतीनशे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यांचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर शरद पवारांसह विरोधकांनी हल्ल्यातील मृतांचा नेमका आकडा सांगा, अशी मागणी केली. तर भाजप अध्यक्ष अमित शाहांनी अडीचशे दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला.

या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनोआ यांनी आम्ही दहशतवादी तळ उद्ध्वस्त करतो, मुडदे मोजत बसत नाही, असं ठणकावून सांगितलं. तर त्याचवेळी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ज्या तळावर हल्ला केला, तिथे हल्ला करण्यापूर्वी 300 मोबाईल कार्यरत होते, अशी माहिती एनटीआरओने दिली.

या सर्व पार्श्वभूमीवर युद्ध किंवा मिलिट्री हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले हे कसं मोजलं जातं, त्याची पद्धत काय? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

मृतदेह कोण मोजतं?

युद्धातील मृतांची संख्या कोण मोजतं? तर कोणीच नाही असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रत्येक जण अंदाज बांधतो. कोणत्याही युद्धात मरणाऱ्यांच्या संख्येचा कोणताही ‘प्रामाणिक’ आकडा नसतो. विशेषत: मोठी कारवाई झालेली असते त्यावेळी नेमका आकडा सांगणं कठीणच असतं. त्याबाबत केवळ अंदाज लावला जातो. जर हा संघर्ष दोन देशांमधील असेल तर हे आणखी अवघड होतं. कारण मरणाऱ्यांची संख्या मोजण्याची जबाबदारी स्थानिक संस्थांवर असते आणि या संस्था सरकारच्या मर्जीने काम करतात. म्हणजे जर सरकारला हा आकडा फुगवून सांगायचा असेल किंवा लपवायचा असेल, तर तसा अहवाल दिला जातो.

मोठ्या प्रमाणावर युद्ध झालं असेल तर संयुक्त राष्ट्रासारख्या संस्था मृतांची आकडेवारी सांगतात, मात्र ती सुद्धा नेमकी आकडेवारी नसते.

मृतदेहांची मोजणी कशी होते?

दोन देशांच्या संघर्षाच्या परिस्थितीत मृतांची मोजणी ही दोघांच्या संयुक्त वापराद्वारे सक्रिय आणि निष्क्रिय निरीक्षणाद्वारे केले जाते. सक्रिय निरीक्षणामध्ये मृतदेहांची मोजणी किंवा घरांचा सर्व्हे केला जातो, त्यानंतर सॅम्पलिंग अर्थात नमुना तंत्रज्ञानाच्या मदतीने, किती लोक मारले गेले आहेत, हे निश्चित केलं जातं.

दुसरी पद्धत म्हणजे पॅसिव्ह अर्थात निष्क्रिय निरीक्षण पद्धती होय. यामध्ये मीडिया, रुग्णालय, शवगृहासह अन्य कायदेशीर संस्थांकडून मिळालेल्या आकडेवारीचा समावेश असतो.

उदाहरणार्थ, यमनमध्ये जानेवारी 2017 पर्यंत युद्धातील मृतांची संख्या दहा हजार इतकी होती, असं संयुक्त राष्ट्राने रुग्णालयाच्या रिपोर्ट्सवरुन सांगितलं होतं.

अडचणी काय?

माहिती कुठून मिळते त्यावर आकडे अवलंबून असतात. उदाहरणार्थ 1994 मध्ये रवांडात झालेल्या जातीय नरसंहारात मारले गेलेल्या लोकांची संख्या 5 लाख ते 10 लाखादरम्यान होती. दुसरीकडे इराकमध्ये आयसिसच्या हल्ल्यात किती लोकांचा जीव गेला याचा नेमका आकडाच नाही.  केवळ ज्या संस्था आयएसला विरोध करत होत्या, त्यांनीच दिलेले आकडे अमेरिकेने मान्य केले.

कोणत्या युद्धात किती लोक मारले गेले, याबाबतचे आकडे वेगवेगळे असतात. कारण संबंधित देशांचे दावे वेगवेगळेच असतात. हे आकडे नेमकं कोण सांगतंय, त्यावर त्याची विश्वासार्हता अवलंबून असते.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं