AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Nagpur | विदर्भातून शिवसेनेला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्त्व मिळणार? शिवसंपर्क अभियानानंतर मुंबईत हालचाली वाढल्या

विदर्भाच्या वाट्याला एखादं प्रतिनिधित्व म्हणून मंत्रीमंडळात स्थान मिळावं, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर विचार करू. विदर्भाला प्रतिनिधीत्व देऊ, असं आश्वासन राऊत यांनी दिलं. त्यामुळं पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Video Nagpur | विदर्भातून शिवसेनेला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्त्व मिळणार? शिवसंपर्क अभियानानंतर मुंबईत हालचाली वाढल्या
विदर्भाला प्रतिनिधीत्व मिळण्याच्या दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 25, 2022 | 1:21 PM
Share

नागपूर : विदर्भातून संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडं मंत्रीपद होतं. परंतु, त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. तेव्हापासून विदर्भाला शिवसेनेनं मंत्रीपद दिलेलं नाही. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या शिवसंपर्क अभियानानंतर (Shiv Sampark Abhiyan) मुंबईत हालचाली वाढल्या. विदर्भात मंत्रीपद देण्याबाबत संजय राऊत यांनी संकेत दिले होते. फडणवीसांच्या नागपूर जिल्हयात मंत्रीपद देण्याची शिवसेनेकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी सेना विदर्भात मंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. संजय राठोड यांच्यानंतर विदर्भात सेनेचा एकही मंत्री नाही. आता शिवसेनेच्या कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते हे पाहवं लागेल.

विदर्भात सेनेचे चार आमदार

विदर्भात निवडणुकीसाठी ताकद वाढावी म्हणून शिवसंपर्क अभियान सुरु झालंय. संसदेचं अधिवेशन सुरु असताना ते सोडून शिवसेनेचे सर्व खासदार शिवसंपर्क अभियानात आलेत. आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार आहे. विदर्भ भाजपचा गढ आहे. त्याच विदर्भात शिवसेनेची ताकद वाढवायची आहे. आतापर्यंत युतीत विदर्भात भाजप जास्त जागा लढवत असल्याने शिवसेनेची ताकद कमी राहिली. विदर्भात सेनेचे चार आमदार, तीन खासदार आहेत. चार आमदारांपैकी एका आमदाराचे मंत्रीपद गेलं. आता तीन आमदारांपैकी कुणाला मंत्रीपद मिळते, हे पाहावं लागेल.

संजय राऊतांनी फुंकले प्राण

शिवसेनेत वाद होते. पण, संजय राऊत नागपुरात आले. तीन दिवस त्यांनी मुक्काम ठोकला. नागपुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यामुळं आता पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. विदर्भाच्या वाट्याला एखादं प्रतिनिधित्व म्हणून मंत्रीमंडळात स्थान मिळाव, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर विचार करू. विदर्भाला प्रतिनिधीत्व देऊ, असं आश्वासन राऊत यांनी दिलं. त्यामुळं पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

Nandurbar Accident | कंटेनर-आर्टिका गाडीचा भीषण अपघात, तीन जण ठार, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

Gondia | अरुणाचल प्रदेशातील हिमवृष्टीत जवानाचा मृत्यू, जवानाचे पार्थिव चिरेखणी गावात पोहचले

Video Bhandara Sports | वय 50 वर्षे, दीड तासात काढले 2550 Push Up, सार काही वर्ल्ड रेकॉर्डसाठी

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....