AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saikheda Dam | यवतमाळमधील सायखेडा धरण पूर्णपणे भरलं, 140 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

पावसाचे आगमन उशिराने का होईना परंतु अतिशय जोरात झाल्याने, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील एकमात्र मध्यम प्रकल्पाचे सायखेडा धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहे.

Saikheda Dam | यवतमाळमधील सायखेडा धरण पूर्णपणे भरलं, 140 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
| Updated on: Aug 09, 2019 | 10:58 AM
Share

यवतमाळ : पावसाचे आगमन उशिराने का होईना परंतु अतिशय जोरात झाल्याने, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील एकमात्र मध्यम प्रकल्पाचे सायखेडा धरण (Yavatmal saikheda dam) पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहे.

केळापूर तालुक्यातील नागरिकांसाठी सायखेडा येथील मध्यम प्रकल्पाचे धरण पिण्याच्या पाण्याचे एकमेव जलस्रोत आहे. शिवाय शेतीसाठीही या धरणाचा मोठा फायदा होतो. तालुक्यातील 140 गावांना याच धरणातील पाण्याचा मुख्य आधार आहे.

पावसाच्या पाण्यामुळे सायखेडा धरण दरवर्षीच भरून ओसंडून वाहत असते. मात्र, येथील धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असून पाटबंधारे विभागातर्फे दरवर्षी धरणात साचलेल्या गाळाचा उपसा करण्यासाठी कोणतीही खास उपाययोजना करण्यात येत नाही.

यावर्षी मान्सूनच आगमन खूपच उशिराने झाले, पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, उशिराने का होईना सर्वंच ठिकाणी दमदार पाऊस पडल्याने तालुक्यातील एकमात्र मध्यम प्रकल्पाचे सायखेडा धरण शंभर टक्के भरले.

धरणाच्या भिंतीवरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. सायखेडा धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील आता मिटलेला आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.