AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गळ्यात रुद्राक्ष धारण करत असाल तर या चुका टाळा, अन्यथा होतील वाईट परिणाम

हिंदू धर्मात रुद्राक्ष धारण करण्याचे धार्मिक महत्त्व तर आहेच पण त्यामुळे लोकांचे आरोग्य ही चांगले राहते. असे मानले जाते की भगवान शंकराच्या अश्रूंपासून रुद्राक्ष तयार होतो त्यामुळे ते धारण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

गळ्यात रुद्राक्ष धारण करत असाल तर या चुका टाळा, अन्यथा होतील वाईट परिणाम
| Edited By: | Updated on: Nov 24, 2024 | 9:28 PM
Share

हिंदू धर्मामध्ये रुद्राक्ष हे शिवाचे प्रतीक मानले जाते आणि ते धारण केल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात. परंतु रुद्राक्ष धारण करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कारण देवाचे देव महादेव यांना रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच रुद्राक्ष अंगावर घालतात. महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जो कोणी त्यांना रुद्राक्ष अर्पण करतो त्याला प्रत्येक कामात यश मिळते अशी मान्यता आहे. असे मानले जाते की रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित आजार सहजपणे होत नाहीत रुद्राक्ष वेगवेगळे आकाराचे असतात. रुद्राक्षांची शक्ती देखील वेगळी आहे. रुद्राक्ष अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जात असल्याने तो धारण करण्याचे काही खास नियम आहेत. त्याचे पालन न केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

झोपताना रुद्राक्ष घालू नका

ज्योतिष शास्त्रानुसार झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढावा. असे मानले जाते की रुद्राक्ष धारण करून झोपल्यास ते अपवित्र होते. दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितले तर झोपताना रुद्राक्ष तुटण्याची भीती असते म्हणून झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढण्याचा नियम आहे. सकाळी आंघोळ केल्यावरच रुद्राक्ष पुन्हा धारण करावा.

मांसाहार आणि मद्यपान करू नका

रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे मास आणि मद्य सेवन करताना रुद्राक्ष धारण करू नये. असे मानले जाते की रुद्राक्ष हे भगवान शिवाला अर्पण आहे म्हणून त्याचे पावित्रभंग केल्यास व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.

मूल जन्माला आल्यानंतर घालू नये

हिंदू धर्मात अशी धारणा आहे की नवजात बालकाच्या जन्मानंतर सुतक लावले जाते. त्यामुळे काही दिवस गोष्टी अशुद्ध राहतात. अशा परिस्थितीत मुलाच्या जन्मानंतर आई आणि मुलाने रुद्राक्ष धारण करणे टाळावे.

राशीनुसार करा रुद्राक्षाचे धारण

ज्योतिष शास्त्रानुसार सुख-समृद्धी आणि सौभाग्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने नेहमी राशीनुसार रुद्राक्ष धारण केले पाहिजे.

जाणून घेऊया बारा राशींसाठी कोणता रुद्राक्ष शुभ मानला जातो.

मेष – एक मुखी, तीन मुखी किंवा पाच मुखी रुद्राक्ष

वृषभ – चार मुखी, सहा मुखी किंवा चौदा मुखी रुद्राक्ष

मिथुन – चार मुखी, पाच मुखी, आणि तेरा मुखी रुद्राक्ष

कर्क – तीन मुखी, पाचमुखी किंवा गौरीशंकर रुद्राक्ष

सिंह – एक मुखी, तीन मुखी आणि पाच मुखी रुद्राक्ष

कन्या – चार मुखी, पाच मुखी आणि तेरा मुखी रुद्राक्ष

तूळ – चार मुखी, सहा मुखी किंवा चौदा मुखी रुद्राक्ष

वृश्चिक – तीन मुखी, पाचमुखी किंवा गौरीशंकर रुद्राक्ष

धनु – एक मुखी, तीन मुखी किंवा पाच मुखी रुद्राक्ष

मकर – चार मुखी, सहामुखी किंवा चौदा मुखी रुद्राक्ष

कुंभ – चार मुखी, सहा मुखी किंवा चौदा मुखी रुद्राक्ष

मीन – तीन मुखी, पाचमुखी किंवा गौरीशंकर रुद्राक्ष

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत