AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात गरम पाण्यानं अंघोळ करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

हिवाळा सुरू झाला असून आपण उबदार कसं राहता येईल, यासाठी प्रयत्न करत असतो. हिवाळ्यात अनेकजण फक्त गरम पाण्यानंच आंघोळ करतात.

हिवाळ्यात गरम पाण्यानं अंघोळ करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
| Edited By: | Updated on: Jan 13, 2025 | 10:06 PM
Share

तुम्ही कडक पाण्याने आंघोळ करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करायला कोणाला आवडत नाही. थंडीत गरम पाण्याचे सेवन हा उत्तम पर्याय असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच लोक पिण्याच्या पाण्यापासून आंघोळीपर्यंत गरम पाण्याचा वापर करतात. थंडीत गरम पाण्याने आंघोळ करणे ही एक आरामदायक भावना आहे, परंतु जर आपण हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करत असाल तर आपण सावध असले पाहिजे.

गरम पाण्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. गरम पाण्यामुळे त्वचा, केस आणि आरोग्यास हानी पोहोचण्याचा धोका असू शकतो. विशेषत: रक्तदाब किंवा हृदयविकाराने त्रस्त असलेल्यांनी गरम पाण्याचा जास्त वापर टाळावा.

गरम पाण्याने आंघोळ करण्याचे तोटे

हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालण्यासाठी अनेकदा विचार करावा लागतो, अशा वेळी लोकांना गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते, पण त्याचे काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

गरम पाण्याचे त्वचेवर कोणते परिणाम होतात?

गरम पाण्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा बाहेर पडू शकतो. यामुळे त्वचा कोरडी होते आणि खाज सुटते. अशावेळी त्वचेच्या समस्या वाढू शकतात. जर तुम्ही गरम पाण्याचा नियमित वापर करत असाल तर तुम्हाला अ‍ॅलर्जी, पुरळ आणि एक्झामा सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोमट पाण्याचा वापर करा आणि आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

केसांच्या समस्या

गरम पाण्यामुळे तुमच्या केसांनही हानी पोहोचू शकते. कारण गरम पाण्यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात आणि काही काळानंतर तुमचे केस गळायला सुरुवात होईल. जास्त गरम पाण्यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढू शकते.

रक्तदाबावर परिणाम

गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्तदाब वाढू शकतो. ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी गरम पाण्याचा वापर करू नये. अत्यंत गरम पाण्यामुळे शरीराचे तापमान बिघडू शकते. ताजे आणि कोमट पाणी वापरा.

जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करू नका

जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करू नये. कारण तुमच्या शरीराचे तापमान खराब होऊ शकते. थंडीच्या दिवसात आंघोळीसाठी 5 मिनिटे पुरेशी असतात. आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून त्वचेचा ओलावा टिकून राहील.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?