AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात गरम पाण्यानं अंघोळ करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

हिवाळा सुरू झाला असून आपण उबदार कसं राहता येईल, यासाठी प्रयत्न करत असतो. हिवाळ्यात अनेकजण फक्त गरम पाण्यानंच आंघोळ करतात.

हिवाळ्यात गरम पाण्यानं अंघोळ करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
| Edited By: | Updated on: Jan 13, 2025 | 10:06 PM
Share

तुम्ही कडक पाण्याने आंघोळ करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करायला कोणाला आवडत नाही. थंडीत गरम पाण्याचे सेवन हा उत्तम पर्याय असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच लोक पिण्याच्या पाण्यापासून आंघोळीपर्यंत गरम पाण्याचा वापर करतात. थंडीत गरम पाण्याने आंघोळ करणे ही एक आरामदायक भावना आहे, परंतु जर आपण हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करत असाल तर आपण सावध असले पाहिजे.

गरम पाण्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. गरम पाण्यामुळे त्वचा, केस आणि आरोग्यास हानी पोहोचण्याचा धोका असू शकतो. विशेषत: रक्तदाब किंवा हृदयविकाराने त्रस्त असलेल्यांनी गरम पाण्याचा जास्त वापर टाळावा.

गरम पाण्याने आंघोळ करण्याचे तोटे

हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालण्यासाठी अनेकदा विचार करावा लागतो, अशा वेळी लोकांना गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते, पण त्याचे काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

गरम पाण्याचे त्वचेवर कोणते परिणाम होतात?

गरम पाण्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा बाहेर पडू शकतो. यामुळे त्वचा कोरडी होते आणि खाज सुटते. अशावेळी त्वचेच्या समस्या वाढू शकतात. जर तुम्ही गरम पाण्याचा नियमित वापर करत असाल तर तुम्हाला अ‍ॅलर्जी, पुरळ आणि एक्झामा सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोमट पाण्याचा वापर करा आणि आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

केसांच्या समस्या

गरम पाण्यामुळे तुमच्या केसांनही हानी पोहोचू शकते. कारण गरम पाण्यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात आणि काही काळानंतर तुमचे केस गळायला सुरुवात होईल. जास्त गरम पाण्यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढू शकते.

रक्तदाबावर परिणाम

गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्तदाब वाढू शकतो. ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी गरम पाण्याचा वापर करू नये. अत्यंत गरम पाण्यामुळे शरीराचे तापमान बिघडू शकते. ताजे आणि कोमट पाणी वापरा.

जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करू नका

जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करू नये. कारण तुमच्या शरीराचे तापमान खराब होऊ शकते. थंडीच्या दिवसात आंघोळीसाठी 5 मिनिटे पुरेशी असतात. आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून त्वचेचा ओलावा टिकून राहील.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?