AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कडक उन्हातही शरीर थंड राहील, उष्माघात टाळण्यासाठी खा ‘हे’ 5 पदार्थ

कडक उन्हामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि उष्माघाताचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी असे पदार्थ खावेत जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला आतून थंड ठेवतात. या लेखात आपण अशा पाच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

कडक उन्हातही शरीर थंड राहील, उष्माघात टाळण्यासाठी खा 'हे' 5 पदार्थ
उष्माघात टाळण्यासाठी खा 'हे' 5 पदार्थImage Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: May 08, 2025 | 3:50 PM
Share

प्रत्येक ऋतूत आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी आपण निरोगी आहार घेत असतो. अशातच आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये वातावरण तीव्र उष्णता जाणवत असते. त्यामुळे उष्मघाताचा प्रमाण वाढते. यामागील कारण म्हणजे डिहायड्रेशन आणि कधीकधी आपल्या आरोग्याची स्थिती गंभीर होते. अशावेळेस आपल्याला उष्मघाताचा त्रास होऊ नये म्हणून शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, त्याशिवाय आपला संपूर्ण आहार बदलला पाहिजे. उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी काहीजण आईस्क्रीमचे सेवन करतात, त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स देखील पितात. पण या गोष्टी आरोग्याला फायदा देत नाहीत तर नुकसान करतात. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी, थंड पदार्थ खाणे तसेच असे पदार्थ खाणे महत्वाचे आहे जे पोषक तत्वांनी समृद्ध असतील आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यास देखील मदत करतील.

उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाला असे काहीतरी खाण्याची इच्छा असते ज्यामुळे त्यांना आर्द्रतेपासून आराम मिळेल. यासाठी कोल्ड्रिंक्स किंवा आईस्क्रीमचा अवलंब करण्याऐवजी तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात ताजेतवाने तर वाटेलच पण तुम्हाला निरोगी राहण्यासही मदत होईल. या लेखात आपण अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया.

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर

उन्हाळ्याच्या दिवसात काकडीचे सेवन दैनंदिन दिनचर्येत करावे. कारण काकडी हा पदार्थ पाण्याने समृद्ध आहेत आणि थंडावा देणारे देखील आहेत. काकडीत 95 टक्के पाणी असते, त्यामुळे उन्हाळ्यात काकडीचा रायता, सॅलड इत्यादी पदार्थ खाणे फायदेशीर ठरते.

कलिंगड हे एक उत्तम फळ

ऋतूनुसार आहारात फळांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यातील हंगामी फळांबद्दल बोलायचे झाले तर, शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हे सर्वोत्तम फळ आहे. त्यात पाणी आणि पोषक तत्वांचे प्रमाणही चांगले असते. कलिंगड हे त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते. तसेच ते खाण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास पाण्यात ठेवावे.

दुधी भोपळा देखील फायदेशीर

उन्हाळ्यात दुधी भोपळा ही अशी भाजी आहे ज्याच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो आणि पोषक तत्वांही मिळतात. दुधी भोपळा हा पाण्याने समृद्ध आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ही भाजी सहज पचते आणि कोणत्याही प्रकारचे आरोग्यास नुकसान करत नाहीत. जरी लोकांना दुधी भोपळ्याची भाजी फारशी आवडत नसली तरी आपण या भाजीच्या गुणांबद्दल बोललो तर उन्हाळ्यात दुधी भोपळा नक्कीच आहारात समाविष्ट करायला हवा.

सब्जा बी

शरीर थंड ठेवण्यासाठी, उन्हाळ्यात तुमच्या आहारात सब्जा बियांचा समावेश करा. जर तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवायचे असेल तर तुम्ही सब्जा बिया लिंबू पाण्यात मिसळून पिऊ शकता. तुम्ही ते दह्यात मिक्स करू शकता किंवा ताक पेय आणि गोंड कटिरा पेयात टाकून याचे सेवन करू शकता. गोंड कटिरा शरीराला थंड ठेवते.

बडीशेप देखील उपयुक्त

जेवणात वापरले जाणारे मसाले अनेक गुणधर्मांनी समृद्ध असतात, परंतु बहुतेक मसाल्यांचे स्वरूप उष्ण असते. सध्या, बडीशेप, वेलची, धणे हे असे मसाले आहेत ज्यांचे स्वरूप थंड असते. उन्हाळ्यात तुम्ही बडीशेप तुमच्या आहाराचा एक भाग बनवली पाहिजे. तुम्ही सकाळी त्याचे पाणी पिऊ शकता. तुम्ही जेवणानंतर बडीशेप खाऊ शकता आणि बडीशेप सिरप बनवू शकता आणि दिवसभरात ते पिऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.