AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे रिठा-आवळा आणि शिककाई; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत!

रिठा-आवळा आणि शिककाई ही नैसर्गिक औषधी वनस्पती आहेत. ज्याचा वापर केसांमध्ये वर्षानुवर्षे केला जात आहे. केसांच्या वाढीसाठी रीठा, आवळा, शिककाई हे खूप चांगले मानले जाते. जाणून घ्या, त्याचे फायदे आणि त्याचा वापर कसा करायचा.

Hair Care Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे रिठा-आवळा आणि शिककाई; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत!
केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे रिठा-आवळा आणि शिककाई; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत!Image Credit source: Google
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Aug 02, 2022 | 9:49 PM
Share

रिठा-आवळा आणि शिककाई या अशा गोष्टी आहेत. ज्या आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून वापरल्या जात आहेत. पूर्वीच्या काळी केस काळे, दाट आणि लांब करण्यासाठी याचा वापर केला जात असे. आजकाल तुम्ही कितीही महागडे शॅम्पू वापरत असलात तरी, सर्वांमध्ये केमिकलचा वापर (Use of chemicals) केला जातो. त्यामुळे केसांना एकप्रकारे नुकसान होते. पण रिठा-आवळा आणि शिककाई ही औषधी वनस्पती (Medicinal plants) आहेत, ज्याचा नैसर्गिकरित्या केसांना फायदा होतो. केसांमध्ये त्यांचा वापर केल्याने केसांचे आरोग्य काही दिवसांतच सुधारू लागते, असे म्हणतात. तसेच, यामुळे सर्व अकाली समस्यांपासून (premature problems) आराम मिळतो. केसांच्या वाढीसाठी रीठा, आवळा, शिककाई हे खूप चांगले मानले जाते. जाणून घ्या, त्याचे फायदे आणि त्याचा वापर कसा करायचा.

केस गळणे थांबविते

केस गळण्याची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. याचे कारण चुकीचे अन्न, रासायनिक पदार्थांचा वापर, गरम करणाऱ्या साधनांचा अतिवापर आणि प्रदूषण इत्यादी मानले जाते. पावसाळ्यात ही समस्या अधिकच बिकट होते. जर तुम्ही रिठा-आवळा आणि शिककाईचा वापर केला तर तुमची समस्या बर्‍याच अंशी आटोक्यात येऊ शकते. रिठा-आवळा आणि शिककाई देखील केसांची वाढ सुधारतात आणि केस निरोगी करतात.

केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करते

जरी तुमचे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागले असतील, तर रिठा-आवळा आणि शिककाई तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या तीन औषधी वनस्पतींचे मिश्रण केस काळे ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. हे तुमच्या पांढर्‍या केसांची वाढ थांबवते. यामुळे अवेळी पांढऱ्या केसांची समस्या आटोक्यात येते.

डोक्यातील कोंडा आणि दुतोंडी केसांपासून मुक्ती

रिठा-आवळा आणि शिककाईमुळे केसांमधील कोंड्याची समस्याही दूर होते. याशिवाय स्प्लिट एंड्समुळे केसांची समस्याही दूर होते. ते लावल्याने केसांना पोषण मिळते. केस चमकदार आणि मजबूत होतात.

वापराची पद्धती

केसांच्या गरजेनुसार रिठा-आवळा आणि शिककाई समान प्रमाणात घ्या आणि थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. रात्रभर चांगले भिजू द्या. सकाळी हे मिश्रण केसांना लावा.

Follow Us
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक