AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात लिंबूपाणी बनवताय? तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बिघडू शकते तुमचे आरोग्य

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. हे केवळ एक ताजेतवाने पेय नाही तर ते पिण्याचे अनेक फायदे आहेत. तथापि अनेकांना लिंबूपाणी योग्यरित्या कसे बनवायचे हे माहित नसते, ज्यामुळे तुमचे आरोग्य देखील बिघडू शकते.

उन्हाळ्यात लिंबूपाणी बनवताय? तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बिघडू शकते तुमचे आरोग्य
lemon juice
| Edited By: | Updated on: May 04, 2025 | 4:16 PM
Share

उन्हाळा सुरू होताच कडक उन्हाचा सामना करावा लागतो. त्यात या दिवसात अनेकजण थंड पेय पित असतात. तर उन्हाळ्यात बहुतेक घरांमध्ये लिंबूपाणी बनवायला सुरुवात होते. हे एक सामान्य पेय आहे जे उन्हाळ्यात तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतेच पण तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता देखील दूर करते. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिल्याने खूप आराम मिळतो. घशाला ओलावा देण्याव्यतिरिक्त, ते शरीराला थंड करते आणि आतून ऊर्जा प्रदान करते.

मात्र अनेकांना लिंबू पाणी योग्य पद्धतीने कसे बनवायचे हे माहित नसते, ज्यामुळे अनेकांचे आरोग्य देखील बिघडते. अशा वेळेस लिंबू पाणी योग्य प्रकारे कसे बनवायचे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. तसेच लिंबूपाणी बनवताना लोक अनेकदा या 5 चुका करतात, या चुकांमुळे तुमचे आरोग्या बिघडु शकते. चला तर मग जाणून घेऊयात लिंबूपाणी बनवताना कोणत्या चुका टाळ्या पाहिजेत.

लिंबूपाणी बनवताना कोणत्या चुका टाळा?

1. बाजारातून आणलेले लिंबू न धुता थेट कापले तर त्यावरील धूळ आणि जंतू त्यांच्या आत शोषली जातात. यामुळे पोट बिघडू शकते किंवा अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. बाजारातून आणलेले लिंबू पाण्याने चांगले धुवावे आणि शक्य असल्यास कोमट पाणी वापरावे.

2. कधीकधी लोकं सकाळी कापलेले लिंबू फ्रिजमध्ये ठेवतात आणि संध्याकाळी तेच वापरतात. पण हे करणे योग्य नाही. कापलेल्या लिंबूमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढतात, ज्यामुळे लिंबू पाणी पिल्यानंतर गॅस, उलट्या किंवा जुलाब सारख्या समस्या उद्भवू शकतात.

3. लिंबू पाणी संतुलित असेल तरच ते आरोग्यदायी असते. जास्त साखर टाकल्याने ते एका प्रकारच्या सरबतमध्ये बदलते, ज्यामुळे वजन वाढू शकते. त्याच वेळी जास्त मीठ टाकल्याने रक्तदाब वाढू शकतो. म्हणून मीठ आणि साखर चवीनुसार मिक्स करा.

4. लोकं अनेकदा लिंबूपाणी बाटलीत साठवतात, परंतु जर बाटली किंवा काच व्यवस्थित स्वच्छ केली नाही तर त्यात असलेले बॅक्टेरिया लिंबूपाणी खराब करू शकतात. यामुळे पोटदुखी किंवा अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

5. जर लिंबूपाणी बनवून काही तास बाहेर टेबलावर ठेवले तर त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात, विशेषतः उन्हाळ्यात. यामुळे, लिंबू पाणी आंबट होऊ शकते आणि ते प्यायल्याने तुम्ही आजारी पडू शकता. नेहमी ताजे लिंबू पाणी बनवा किंवा फ्रिजमध्ये ठेवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...