AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी वापरा दह्याचा फेसपॅक, ‘असा’ बनवा फेसपॅक घरच्या घरी

चेहऱ्याचा तेलकटपण दूर करण्यासाठी आणि त्याला अधिक तजेलदार करण्यासाठी दही वापरा. त्याचा फेसपॅक करून लावल्यास अधिक उत्तम....

Skin Care Tips : उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी वापरा दह्याचा फेसपॅक,  'असा' बनवा फेसपॅक घरच्या घरी
केवळ चेहराच नाही तर मानेलाही स्क्रब आणि मॉइश्चरायझेशन करणे आवश्यक आहे.
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 6:35 PM
Share

मुंबई : नुकताच उन्हाळा (Summer) सुरू झालाय. अश्यात त्वचेच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे या तळपत्या उन्हापासून तुमच्या त्वचेची आणि चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. उन्हाळ्याच्या दिवसात चेहरा अधिक तेलकट (Oily Skin) होतो. हा तेलकटपणा नियंत्रित करण्यासाठी तसंच तेलकट त्वचेच्या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर केला जातो. पण बऱ्याचदा त्याचा चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. त्याचमुळे आम्ही घरगुती उपाय सांगणार आहोत.ज्यामुळे तुमचा चेहरा तेलकट होणार नाही शिवाय तुमचा चेहरा अधिक ग्लो करेल. चेहऱ्याचा तेलकटपण दूर करण्यासाठी आणि त्याला अधिक तजेलदार करण्यासाठी दही वापरा.दह्याचा फेसपॅक (Curd Face Pack) करून लावल्यास अधिक उत्तम.

फेसपॅक कसा बनवायचा

दही पॅक बनवण्यासाठी दोन चमचे दही, अर्धा चमचा हळद, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घ्या. एका भांड्यात हे सगळे पदार्थ एकत्र करा. तयार झालेलं मिश्रण चेहऱ्याला लावा. 20 मिनिटं तसंच चेहऱ्यावर राहू द्या. पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

उन्हाळ्यात चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी, चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी दही उत्तम आहे. दही वापरल्याने सनबर्न, टॅनिंग, मुरुम, डाग दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावर दही लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्याही दूर होतात. दह्याचा वापर चेहऱ्यावर मसाज करण्यापासून ते स्क्रबिंगपर्यंत करता येतो.

दह्याचे फायदे

उन्हाळ्यात दही लावल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो. उन्हाळ्यातील उन्हामुळ त्वचेचा रंग काळसर होतो. अश्यात चेहऱ्यावर दही वापरल्याने त्वचेचा रंग उजळू लागतो.उन्हाळ्यात चेहऱ्यावर दही लावल्याने त्वचेतील मृत पेशी निघून जातात. त्यामुळे चेहऱ्याचा रंग स्वच्छ आणि त्वचा नितळ राहते.प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या दहीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे मुरुम कमी करण्यास मदत करतात.दही त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्हीही तुमच्या चेहऱ्यासाठी दही वापरा, आणि फरक अनुभवा.

संबंधित बातम्या

Metro 2A आणि Metro 7 रविवारपासून सेवेत! ईस्ट-वेस्टच्या ट्रॅफिकची चिंता मिटणार

Weight Lose Tips : ‘या’ चार फळांचा आहारात समावेश करा आणि वजन घटवा!

तुमच्या मनात असतं एक आणि बोलता भलतंच? सावधान! तुम्हाला असू शकतो ‘हा’ गंभीर आजार

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.