AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chilblains | हिवाळ्याच्या दिवसांत होतोय ‘चिल ब्लेन’चा त्रास, जाणून घ्या याची लक्षणे आणि उपाय!

भारतात सतत थंडीची लाट वाढत आहे. बर्‍याच ठिकाणी पारा शून्यावरुन खाली आला असून, थंडीमुळे जनजीवन विचलित होत आहे.

Chilblains | हिवाळ्याच्या दिवसांत होतोय ‘चिल ब्लेन’चा त्रास, जाणून घ्या याची लक्षणे आणि उपाय!
| Updated on: Jan 01, 2021 | 6:37 PM
Share

मुंबई : भारतात सतत थंडीची लाट वाढत आहे. बर्‍याच ठिकाणी पारा शून्यावरुन खाली आला असून, थंडीमुळे जनजीवन विचलित होत आहे. अशा परिस्थितीत ‘चिल ब्लेन’ नावाच्या सर्दी-ताप तापाचा आणखी एक आजार होण्याची शक्यता वाढली आहे. ‘चिल ब्लेन’ हा काही नवीन आजार नाही. हिवाळ्यात होणारा हा एक सामान्य रोग आहे. विशेषत: ज्या महिला थंडीत काम करण्यासाठी बाहेर पडतात, त्यांना याचा धोका अधिक असतो. अनेकांना या आजाराबाबत माहिती नसते (Chilblain problem during winter season know the symptoms and precautions).

चिल ब्लेनचा वाढता धोका पाहता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेही याबाबत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. हा अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ रोगाची कारणे, उपाय आणि लक्षणे स्पष्ट करतो. कोल्ड वेव्हमुळे होणाऱ्या या आजाराचा मुलांवर आणि स्त्रियांवर अधिक परिणाम होतो.

चिल ब्लेन म्हणजे काय?

वास्तविक, हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त वेळा थंड हवेच्या संपर्कात आल्याने, हात-पाय आणि शरीराच्या छोट्या रक्तवाहिन्या सूजतात, यालाच चिल ब्लेन म्हणतात. या आजारामुळे हातापायाची बोटं आणि बर्‍याच केसेसमध्ये कानाचा खालचा भाग सुजल्याचे दिसून आले आहे. दरम्यान काही जणांमध्ये गाल आणि चेहऱ्यावर देखील सूज दिसली आहे.

याची लक्षणे कोणती?

जर हातापायाच्या बोटांवर किंवा गालावर अचानक तीव्र खाज, जळजळ होत असेल तर ती या आजाराची सुरुवात असू शकते. याव्यतिरिक्त तीव्र वेदना आणि खाज आल्यामुळे तो भागही हलका लाल होतो. वास्तविक, तीव्र थंडीत अचानक गरम वातावरण तयार झाल्यास ही समस्या निर्माण होते (Chilblain problem during winter season know the symptoms and precautions).

काय कराल?

जर आपल्यालाही अशीच समस्या जाणवत असेल, तर मग नखांनी ओरखडे न लावता, त्या भागाला कापडाने चोळा. तसेच, बर्‍याचदा लोक थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आगीच्या किंवा शेकोटीच्या शेजारी जाऊन बसतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. थंडीत ‘चिल ब्लेन’ची समस्या उद्भवल्यास आगीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून ऊब घेऊ नका. अन्यथा तुमची ‘चिल ब्लेन’ची समस्या आणखी वाढू शकते.

या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी गरम पाण्यात थोडे मीठ घाला आणि त्यात हात पाय काही वेळासाठी बुडवून ठेवा. जर आपल्या समस्येने तीव्र रूप धारण केले असेल तर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, शीतलहरीत कोणत्याही पूर्व तयारीशिवाय घराबाहेर पडू नका आणि थंडीत शक्यतो बाहेर जाणे टाळा.

खबरदारीसाठी काय कराल?

दुचाकी चालवताना हातमोजे आणि पायातही मोजे घाला. महिलांनी घरी वावरताना मोजे घालण्याबरोबरच कापडी बूटदेखील वापरायला हवेत. शक्यतो हातपाय थंड पाण्यापासून सुरक्षित ठेवा. शीतलहर सुरु असताना प्रवास करणे टाळा आणि आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा.

(Chilblain problem during winter season know the symptoms and precautions)

Follow Us
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.