सतत एसीत राहिल्याने त्वचेला त्रास होतो का? घरच्या घरी असे उपचार करू शकता
यंदाचा उन्हाळ्याने उष्णतेचे आजवरचे विक्रम मोडीत काढले. वाढलेल्या उकाड्यामुळे एसीत राहणंच पसंत केलं जातं. पण सतंत एसीच्या थंडाव्यात राहिल्याने त्वचेवर परिणाम होता. त्वचा कोरडी पडते, असं बोललं जातं. जर तसं झालं तर घरगुती काय उपचार करता येतील जाणून घ्या.

उन्हाळ्यात बाहेर पडल्यानंतर उकाड्याने जीव कासावीस होतो. कधी एकदाचं घरी किंवा ऑफिसात पोहोचतो आणि एसीत बसतो असं होतं. कारण यंदा उकाड्याने जगणं असह्य झालं आहे. त्यामुळे आराम मिळावा यासाठी एसीत राहण्याला पसंती दिली जाते. पण एसीच्या थंड वातावरणात राहिल्याने फक्त आरोग्याचंच नाही तर त्वचेचंही नुकसान होते. पबमेडनुसार काही रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. कमी आर्द्रता असलेल्या वातानुकूलित वातावरणामुळे त्वचेच्या कोरडेपणाची लक्षणे उद्भवू शकतात. आर्द्रतेचाही त्वचेवर महत्त्वाचा परिणाम होऊ शकतो. त्वचेच्या वरच्या थरातील (स्ट्रॅटम कॉर्नियम) पाण्याच्या प्रमाणात बदल होतो, त्वचेची लवचिकता कमी होते आणि खडबडीतपणा वाढतो. सतत वातानुकूलित खोलीत राहिल्याने आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव होते का? आम्ही या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत आणि अशा परिस्थितीत आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात..
या गोष्टी लक्षात ठेवा
- मॉइश्चरायझरचा वापर करा: जर तुमची त्वचा कोरडी असेल किंवा एसी बसून तसं झालं असेल तर काळजी घेणं आवश्यक आहे. मॉइश्चरायझरचा वापर करा. यामुळे त्वचेतील शुष्कपणा कमी होईल आणि त्वचा तजेलदार राहण्यास मदत होईल. तसेच एसीचं तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान ठेवा. जेणेकरून शरीरासाठी तापमान अनुकूल राहील. सलग एसीत बसू नका आणि एक दीड तासांनी पाच मिनिटांचा ब्रेक घ्या.
- सुती आणि सैल कपडे घाला: उन्हाळ्यात सुती आणि सैल कपडे घालणं फायद्याचं ठरेल. कारण त्यामुळे तुमचं शरीर थंड राहिल. तसेच तीव्र उष्णतेचा त्रास जाणवणार नाही. तसेच एसीत जास्त वेळ राहण्याची गरजही भासणार नाही. तसेच प्राणायाम करून शरीर राहण्यात मदत होईल.
- कोरफड वापरा: कोरफडमध्ये त्वचेला नैसर्गिरित्या मॉइश्चराइझ करण्याचे गुणधर्म आहेत. त्यातील बॅक्टेरिया विरोधी गुणधर्मामुळे खाज आणि जळजळ कमी होते
- खोलीत पाण्याचा ग्लास ठेवा: सध्या ही बाब सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. त्यामुळे याबाबत बरंच काही सांगितलं आहे. एसी असलेल्या खोलीत पाण्याचा ग्लास ठेवला तर फायदा होतो. एसी हवेतील सर्व ओलावा शोषून घेते. पाण्याच्या ग्लासमुळे हवेतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे त्वचा, ओठ आणि हातपाय कोरडे पडत नाहीत.