AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tulsi | चुकूनही चावून खाऊ नका तुळशीची पाने, अन्यथा होऊ शकते नुकसान!

तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, जे खोकला, सर्दी, पडसे यासारख्या समस्यांना आपल्यापासून दूर ठेवतात आणि श्वसन प्रणालीला अधिक बळकट बनवतात.

Tulsi | चुकूनही चावून खाऊ नका तुळशीची पाने, अन्यथा होऊ शकते नुकसान!
तुळस
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Feb 10, 2021 | 3:15 PM
Share

मुंबई : धार्मिकदृष्ट्या, तुळशीची रोपटे अतिशय पवित्र मानले जाते. असा विश्वास आहे की, घरात हे रोपटे ठेवल्याने नकारात्मकता दूर होते, तसेच कुटुंबात आनंद आणि समृध्दीचे वातावरण तयार होते. तुळस या वनस्पतीचे महत्त्व जितके धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच आयुर्वेदातही आहे, याबद्दल आपल्याला माहित आहे का? तुळशीला आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हटले जाते, जी एखाद्या व्यक्तीला अनेक आजारांपासून वाचवते. जर, आपल्याला दररोज रिकाम्या पोटीवर तुळसची पाच पाने खाण्याची सवय असेल, तर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि कोणतेही आजार तुमच्या अवतीभोवती फिरकणार देखील नाहीत. मात्र, ही आरोग्यदायी पाने कधीही चावून खाऊ नयेत. चला तर याबद्दल अधिक जाणून घेऊया…( Don’t chew tulsi leaves it is harmful for teeth)

तुळशीचे आरोग्यदायी गुणधर्म :

– तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, जे खोकला, सर्दी, पडसे यासारख्या समस्यांना आपल्यापासून दूर ठेवतात आणि श्वसन प्रणालीला अधिक बळकट बनवतात. याशिवाय तुळशीची पाने पाचन समस्या दूर करतात.

– तुळशीच्या पानांमध्ये असलेले अ‍ॅडाप्टोजेन ताण कमी करण्याचे काम करते. याचे नियमित सेवन केल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि नर्व्हस सिस्टीमला आराम मिळतो. तुळशीची पाने डोकेदुखीमध्ये देखील आराम देतात.

– जर आपल्याला बर्‍याचदा अॅसिडीटी, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवत असतील, तर तुळशीच्या पानांचा रस नियमित सेवन केल्यास बराच आराम मिळतो. यामुळे, शरीराची पीएच पातळी देखील संतुलित राहते (Don’t chew tulsi leaves it is harmful for teeth).

– तुळस आपल्या शरीरास डिटोक्स करते आणि चयापचय दर वाढवते. तुळशीची पाने वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरतात.

– मुख दुर्गंधीचा त्रासही तुळशीच्या पानांनी नाहीसा होतो. जर तुम्ही दररोज सकाळी तुळशीची पाने रिकाम्या पोटी खाल्ली तर, ती तोंडातील बॅक्टेरिया काढून टाकतात आणि तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास दूर करतात.

कसे कराल सेवन?

रात्री तुळशीची चार ते पाच पाने एका भांड्यात भिजत घाला. सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह ही पाने थेट गिळा. जर आपण पाने थेट गिळू शकत नसाल तर, ते पाणी प्या. आणि त्यातील पाणी पुन्हा काही पाणी टाकून उकळवा, नंतर ते फिल्टर करा आणि चहासारखे प्या.

चुकूनही चावू नका तुळशीचे पान!

बरेच लोक तुळशीची पाने चवतात आणि खातात, अशी चूक करू नका. कारण तुळशीच्या पानांमध्ये पारा आढळतो. आपल्या दातांच्या आरोग्यासाठी तो योग्य मानला जात नाही. जर तुळशीची पाने नियमितपणे चावून खाल्ली गेली तर, त्यामुळे आपले दात कमकुवत आणि खराब होऊ शकतात.

(Don’t chew tulsi leaves it is harmful for teeth)

हेही वाचा :

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली