AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिताय? शरीराला होऊ शकतो घातक धोका! वाचा सविस्तर…

कडक उन्हात बाहेरून घरात आल्यानंतर लगेच पाणी पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात. हेच खरं का? तापलेल्या शरीरात अचानक थंड पाणी प्यायल्याने काय परिणाम होऊ शकतात? आणि पाणी प्यायचं असेल तर किती वेळ थांबायला हवं?

उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिताय? शरीराला होऊ शकतो घातक धोका! वाचा सविस्तर...
उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिता का ?Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Apr 28, 2025 | 2:40 PM
Share

उन्हाळ्यात कडक उन्हात बाहेर पडल्यावर शरीराच्या आंतरिक तापमानात मोठी वाढ होते. अशा वेळी घरात आल्यावर थंड पाणी पिण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे.पण तज्ज्ञ सांगतात की, लगेच थंड पाणी पिणे आपल्यासाठी धोकादायक होऊ शकतं. हे का घडतं आणि पाणी कधी प्यावं, हे जाणून घेऊया.

उन्हात जास्त वेळ घालवल्यामुळे शरीराचे आंतरिक तापमान वाढलेले असते. अशा स्थितीत शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, जर आपण तात्काळ थंड पाणी प्यालं, तर शरीराच्या तापमानाच्या नैसर्गिक समतोलात बिघाड होऊ शकतो. याचा परिणाम शारीरिक धक्का, रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे किंवा पाचनाशी संबंधित समस्यांमध्ये होऊ शकतो. याशिवाय, अचानक थंड पाणी पिण्यामुळे पोटात गॅस होणे, घसा बसणे किंवा तोंडात खवखवणे सारख्या त्रासांची शक्यता असते.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, उन्हातून आल्यानंतर पाणी पिण्याआधी किमान 5 ते 10  मिनिटे थांबणे आवश्यक आहे. या वेळेत शरीराला थोडं आराम द्या, पंख्याखाली किंवा सावलीत बसून शरीराला शांत होऊ द्या. तसेच, चेहऱ्यावर किंवा हाता-पायांवर हलके पाणी फेकून शरीराचे तापमान कमी करा. यामुळे शरीर थोडं थंड होईल आणि पाणी पिणे सुरक्षित ठरेल. मात्र, थोडे थोडे हळूहळू पाणी प्या. एकदम तासभर पाणी प्यायल्यास पाचनावर दुष्परिणाम होऊ शकतात.

विशेष काळजी घ्या जर तुम्ही खूप वेळ बाहेर होते आणि शरीराला कमी पाणी मिळाले असेल. अशा स्थितीत लगेच थंड, बर्फाळ पाणी पिणे टाळा. हे शरीराच्या हृदय गतीवर आणि पाचनावर परिणाम करू शकते. जर तुम्हाला तहान लागली असेल, तरी थोडं थोडं पाणी प्यायल्यास मळमळ किंवा उलटी होण्याची शक्यता कमी होते.

शरीराचे तापमान सामान्य होण्यापूर्वी थंड पाणी प्यायल्यास उष्माघात होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे, उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने थंड पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि सावधगिरी अत्यंत महत्त्वाची आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.