AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिताय? शरीराला होऊ शकतो घातक धोका! वाचा सविस्तर…

कडक उन्हात बाहेरून घरात आल्यानंतर लगेच पाणी पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात. हेच खरं का? तापलेल्या शरीरात अचानक थंड पाणी प्यायल्याने काय परिणाम होऊ शकतात? आणि पाणी प्यायचं असेल तर किती वेळ थांबायला हवं?

उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिताय? शरीराला होऊ शकतो घातक धोका! वाचा सविस्तर...
उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिता का ?Image Credit source: social media
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 28, 2025 | 2:40 PM
Share

उन्हाळ्यात कडक उन्हात बाहेर पडल्यावर शरीराच्या आंतरिक तापमानात मोठी वाढ होते. अशा वेळी घरात आल्यावर थंड पाणी पिण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे.पण तज्ज्ञ सांगतात की, लगेच थंड पाणी पिणे आपल्यासाठी धोकादायक होऊ शकतं. हे का घडतं आणि पाणी कधी प्यावं, हे जाणून घेऊया.

उन्हात जास्त वेळ घालवल्यामुळे शरीराचे आंतरिक तापमान वाढलेले असते. अशा स्थितीत शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, जर आपण तात्काळ थंड पाणी प्यालं, तर शरीराच्या तापमानाच्या नैसर्गिक समतोलात बिघाड होऊ शकतो. याचा परिणाम शारीरिक धक्का, रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे किंवा पाचनाशी संबंधित समस्यांमध्ये होऊ शकतो. याशिवाय, अचानक थंड पाणी पिण्यामुळे पोटात गॅस होणे, घसा बसणे किंवा तोंडात खवखवणे सारख्या त्रासांची शक्यता असते.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, उन्हातून आल्यानंतर पाणी पिण्याआधी किमान 5 ते 10  मिनिटे थांबणे आवश्यक आहे. या वेळेत शरीराला थोडं आराम द्या, पंख्याखाली किंवा सावलीत बसून शरीराला शांत होऊ द्या. तसेच, चेहऱ्यावर किंवा हाता-पायांवर हलके पाणी फेकून शरीराचे तापमान कमी करा. यामुळे शरीर थोडं थंड होईल आणि पाणी पिणे सुरक्षित ठरेल. मात्र, थोडे थोडे हळूहळू पाणी प्या. एकदम तासभर पाणी प्यायल्यास पाचनावर दुष्परिणाम होऊ शकतात.

विशेष काळजी घ्या जर तुम्ही खूप वेळ बाहेर होते आणि शरीराला कमी पाणी मिळाले असेल. अशा स्थितीत लगेच थंड, बर्फाळ पाणी पिणे टाळा. हे शरीराच्या हृदय गतीवर आणि पाचनावर परिणाम करू शकते. जर तुम्हाला तहान लागली असेल, तरी थोडं थोडं पाणी प्यायल्यास मळमळ किंवा उलटी होण्याची शक्यता कमी होते.

शरीराचे तापमान सामान्य होण्यापूर्वी थंड पाणी प्यायल्यास उष्माघात होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे, उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने थंड पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि सावधगिरी अत्यंत महत्त्वाची आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन् आझाद मैदानावर...