AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुपारच्या जेवणानंतर येणारी झोप आणि आळस दूर करण्यासाठी तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ 3 उपायांचा करा अवलंब

दुपारच्या जेवणानंतर झोप येणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु याचा तुमच्या रोजच्या दिनचर्येवर परिणाम होऊ लागला तर आरोग्याकडे लक्ष देणे महत्वाचे ठरते. चला तर मग आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात की दुपारच्या जेवणानंतर येणारी झोप दूर करण्यासाठी कोणत्या तीन उपायांचा अवलंब करणे योग्य आहे.

दुपारच्या जेवणानंतर येणारी झोप आणि आळस दूर करण्यासाठी तज्ञांनी सांगितलेल्या 'या' 3 उपायांचा करा अवलंब
यामुळे शारीरिक ऊर्जा वाढते. तसेच मनाला आराम मिळतो, असे ज्योतिष्यांचे म्हणणे आहे.
| Edited By: | Updated on: Jul 16, 2025 | 5:09 PM
Share

तुमच्यासोबतही असं घडतं का की दुपारचे जेवण करताच तुम्हाला झोप येऊ लागते? दुपारच्या पोटभर जेवणानंतर डोळे जड होऊ लागतात. तर या सामान्य समस्येला ‘फूड कोमा’ किंवा ‘पोस्ट-लंच डिप्रेशन’ असेही म्हणतात, जे तुमच्या शरीरातील उत्पादकता कमी करू शकते. बऱ्याचदा लोकांना वाटते की जेवल्यानंतर झोप येणे सामान्य आहे, परंतु जर त्याचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होऊ लागला तर त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.

तर यावेळेस पोषणतज्ञांनी काही सोपे मार्ग सांगितले आहेत ज्याद्वारे तुम्ही या दुपारी जेवणानंतर येणाऱ्या झोपेच्या समस्येपासून सहज मुक्त होऊ शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात…

तुमच्या आहारात ‘योग्य’ कार्बोहायड्रेट्स पदार्थांचा समावेश करा

बऱ्याचदा आपण दुपारच्या जेवणात असे पदार्थ खातो की ज्यामुळे आपल्याला त्वरित ऊर्जा मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला लवकर सुस्तीही येते. याचे कारण साधे कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने होते. जसे की पांढरा भात, नूडल्स, ब्रेड आणि गोड पेये खूप लवकर पचतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढते आणि कमी होते. या चढ-उतारामुळे आळस येतो.

त्याऐवजी, तुमच्या आहारात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा. असे काही पदार्थ जे फायबरने समृद्ध असतात आणि हळूहळू पचतात, ज्यामुळे उर्जेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

जेवल्यानंतर 15-20 मिनिटे चालणे

जेवणानंतर लगेच ऑफिसमध्ये बसून काम करणे किंवा झोपणे म्हणजे झोपेला आमंत्रण देण्यासारखे आहे. जेवणानंतर किमान 15-20 मिनिटे हलके चालण्याचा सल्ला तज्ञ देतात. यामुळे तुमचे पचन सुधारतेच, शिवाय रक्ताभिसरण देखील वाढते .

जेवणानंतर चालल्याने तुमच्या शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारते, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने आणि सक्रिय वाटते. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा किंवा तुमच्या ऑफिसच्या परिसरात थोडेसे चाला.

जेवणासोबत किंवा जेवणानंतर ताक प्या

ताक हे एक उत्तम पेय आहे जे दुपारच्या जेवणानंतरच्या येणारा आळास यापासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे. ताक केवळ पोट हलके ठेवत नाही तर पचनास मदत करणारे प्रोबायोटिक्स देखील असतात.

ताक प्यायल्याने तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि त्यातील गुणधर्म तुम्हाला ऊर्जावान बनवतात. तुम्ही जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच एक ग्लास साधे ताक पिऊ शकता. त्यात जास्त मसाले किंवा मीठ टाकू नका, जेणेकरून ते त्याचे काम योग्यरित्या करू शकेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.