AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पांढऱ्या मिठाऐवजी कोणते पर्याय आहेत योग्य? वाचा सविस्तर !

तुमच्या ताटातील मीठ फक्त चव वाढवतंय की आरोग्यावरही परिणाम करतंय? पांढऱ्या मिठाच्या पलीकडे काळं मीठ, सैंधव मिठासारखे नैसर्गिक पर्याय आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात. कोणतं मीठ तुमच्यासाठी योग्य आहे? जाणून घ्या आणि करा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने स्मार्ट निवड!

पांढऱ्या मिठाऐवजी कोणते पर्याय आहेत योग्य? वाचा सविस्तर !
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 3:44 PM
Share

आपल्या जेवणात मीठ नसेल तर सगळंच अळणी ! पदार्थांची चव खुलवण्यासाठी चिमूटभर मीठ लागतंच. पण आपण बहुतांशी वेळा कोणतं मीठ वापरतो? अर्थात, आपल्या घरातल्या डब्यातलं ते पांढरं शुभ्र, बारीक मीठ. याच मिठाची आपल्याला सवय असते. पण तुम्हाला हे ऐकून कदाचित नवल वाटेल की, हे नेहमीचं पांढरं मीठ हा मिठाचा एकमेव प्रकार नाही. निसर्गात आणि बाजारात मिठाचे अनेक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत आणि त्यातले काही तर आपल्या नेहमीच्या मिठापेक्षा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर मानले जातात.

मिठाचे प्रकार आणि त्याचे फायदे

पांढरं मीठ : आता जरी पांढरं मीठ आपल्या घराघरात असलं तरी, याचं जास्त प्रमाणात सेवन उच्च रक्तदाब आणि इतर समस्या निर्माण करू शकतं. समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून बनवलेलं हे मीठ शरीराला सोडियम देतं, पण त्याची जास्ती शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे, हे मीठ योग्य प्रमाणातच वापरावं आणि त्याबाबत जागरूक असणं महत्त्वाचं आहे.

काळं मीठ : काळं मीठ, जे आयुर्वेदात अनेक प्रकारे वापरलं जातं, याच्या वापरामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामध्ये सोडियमच्या तुलनेत कमी प्रमाण असतं म्हणून अनेक लोक पचवणाऱ्या समस्या जसे गॅस आणि अपचन यावर काळं मीठ वापरण्याचा सल्ला देतात.

सैंधव मीठ : सैंधव मीठ हे खडकाच्या रूपात मिळणारं एक अत्यंत शुद्ध मीठ आहे. याला उपवासाचं मीठ म्हणून ओळखलं जातं. सैंधव मीठ अत्यंत कमी प्रक्रिया केलेलं असून, त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजं असतात, जी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरतात. यामुळे पोटाची समस्या आणि स्नायूंच्या कोंड्यांमध्ये सुधारणा होऊ शकते.

मग आता योग्य मिठाची निवड कशी कराल?

आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर, सैंधव मीठ एक उत्तम पर्याय ठरू शकतं, कारण त्यात नैसर्गिक खनिजं असतात, आणि ते शरीरासाठी अधिक उपयुक्त असतं. काळं मीठदेखील पचनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतं. पांढऱ्या मिठाच्या वापराला मर्यादा घालून आणि नैसर्गिक पर्यायांचा समावेश करणे अधिक योग्य ठरेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.