AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!

रीठा ही एक औषधी वनस्पती आहे, ज्यात लोहाचे प्रमाण अधिक आहे. लोह आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त घटक आहे.

Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 24, 2020 | 5:32 PM
Share

मुंबई : केसांची समस्या या आता अगदी सामान्य झाल्या आहेत. आपल्यापैकी बहुतेकांना केसांची कोणतीना कोणती समस्या असतेच. बरेच लोक दररोज गळून पडणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहे. या समस्यांमधून मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम आप्रले जातात. इतकेच नाही तर अनेक प्रकारची औषधे देखील खाल्ली जातात. परंतु, इतके करूनही या समस्या काही बऱ्या होत नाहीत. यातही असे काही लोक आहेत जे घरगुती उपचारांचा अवलंब करुन काही प्रमाणात त्यांच्या केसांना योग्य पोषण देतात. काही घरगुती उपाय आणि औषधे वापरून आपण आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो. या सगळ्यात ‘रीठा’ हा केसांच्या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय आहे (Home remedies with reetha will prevent hair fall).

रीठा ही एक औषधी वनस्पती आहे, ज्यात लोहाचे प्रमाण अधिक आहे. लोह आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त घटक आहे. रीठात असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्मेटोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार,  रीठा एक उत्कृष्ट क्लिनिंग एजंट आहे, जो आपल्या केसांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवतो.

जर आपल्यालाही केसांच्या कुठल्या समस्या असतील तर,रीठा वापरणे फायद्याचे ठरेल. रीठा आपल्या केसांना गळण्यापासून किंवा तुटण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच, आपल्या केसांच्या वाढीला मदत करते. रीठा नियमित वापरल्याने डोक्यात उवांची समस्या उद्भवणार नाही. याशिवाय रीठा आपले केस काळे, कोमल आणि मऊ बनवते.

चला जाणून घेऊया ‘रीठा’च्या फायद्यांविषयी :

– रीठा तुमचे निर्जीव व कोरडे झालेले केस पुन्हा चमकदार करण्यात मदत करते. रीठायुक्त हेअर पॅक आपल्या केसांचा रुक्षपणा घालवून, गेलेली चमक पुन्हा मिळवून देतो.

– रीठा केसातील कोंड्याच्या समस्येवर देखील चांगला उपाय आहे. केसांतील कोंडा काढून टाकण्यासाठी रीठा पाण्यात भिजत ठेवून, नंतर त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावा. या हेअर पॅकच्या निअय्मित वापरणे कोंड्याची समस्या नाहीशी होईल. आंघोळ करण्यापूर्वी आपण पेस्ट केसांमध्ये लावून नंतर केस धुवू शकता.

– जर आपले केस खूप गळत असतील, तर अंघोळीपूर्वी रीठाच्या पाण्याने केस धुवा. असे केल्याने आपल्या केस गळतीचे प्रमाण कमी होईल (Home remedies with reetha will prevent hair fall).

रीठायुक्त हेअर पॅक बनवण्याची कृती :

रीठा हेअर पॅक बनवण्यासाठी 1 अंडे, 1 चमचा आवळा पावडर, कोरडा रीठा आणि शिकाकाई पावडर एकत्र मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टने स्काल्पला मसाज करा आणि अर्धा तास तसेच ठेवा. साधारण अर्धा तासानंतर आपले केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून साधारण दोनवेळा ही प्रक्रिया करा. यानंतर आपली केस गळतीची समस्या हळूहळू कमी होत असल्याचे तुम्हाला स्वतः जाणवू लागेल.

(टीप : कुठल्याही उपचारापूर्वी सौंदर्यतज्ज्ञ अथवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

(Home remedies with reetha will prevent hair fall)

हेही वाचा :

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.