AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा फ्रीज ठरू शकतो आजाराचं कारण, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न सेवन करण्याचे दुष्परिणाम माहीत आहेत का ?

अनेकदा वेळेआभावी आपण अन्न जास्त बनवून फ्रिजमध्ये ठेवतो पण खरंच ते सुरक्षित आहे का आणि कितपत हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. अन्यथा असे अन्न खाऊन आजर वाढण्याची शक्यता जास्तच असते. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न सेवन करण्याचे दुष्परिणाम माहीत आहेत का? याबद्दल जाणून घेऊयात.

तुमचा फ्रीज ठरू शकतो आजाराचं कारण, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न सेवन करण्याचे दुष्परिणाम माहीत आहेत का ?
How long can food last in the refrigeratorImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Aug 27, 2025 | 7:14 PM
Share

आजकालच्या धावत्या जीवनशैलीमुळे, जॉबमुळे अनेकांना दररोज ताजे अन्न शिजविणे खूप कठीण झाले आहे. यामुळे, काही लोक अनेकदा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अन्न शिजवून तयार करतात आणि नंतर वापरण्यासाठी ते रेफ्रिजरेटरमध्ये साठवतात. पण बरेच आरोग्य तज्ञ असे फ्रिजमध्ये साठवलेले अन्न न खाण्याचा सल्ला देतात. फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवलेल्या अन्न खाल्ल्याने काय दुष्परिणाम होतात आणि ते किती वेळ साठवून ठेवणे योग्य आहे, हे जाणून घेऊया.

फ्रीजमध्ये अन्न साठवणं योग्य आहे की नाही ?

फ्रीजमध्ये अन्न ठेवल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होतात, असा लोकांमध्ये गैरसमज आहे. उलट, काही वेळा स्वयंपाक करतानाच अन्नातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर जीवनसत्त्वं ही उष्णतेमुळे नष्ट होतात, थंडाव्यामुळे नव्हे. हवाबंद डब्यात शिजवलेले बहुतेक अन्न किमान दोन ते तीन दिवस टिकू शकते, अगदी एक आठवड्यापर्यंत चांगले राहू शकते, असे तज्ज्ञांनी नमूद केले. फ्रीझरमध्ये ठेवलेले अनेक खाद्यपदार्थ सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतात. सर्व जैविक क्रिया या तापमानासह मंदावतात त्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता कमी असते. पण शक्यतो ताज अन्न खाणे योग्य

काही पदार्थ लवकर खराब होतात

लवकर खराब होणारे पदार्थांची यादी नक्की वेगळी आहे. साध्या शिजवलेल्या भातामध्ये कधीकधी असे जीवाणू वाढू शकतात जे कमी तापमानातही चांगले टिकतात. म्हणूनच फ्रिजमध्ये ठेवलेला भात एक दिवस किंवा दोन दिवसात खाऊन संपवणे कधीही चांगले आहे. याशिवाय भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मसाले, खारट आणि आंबट पदार्थ फ्रिज-फ्रेंडली असतात जसं की घरी लावलेलं दही, लोणचे इत्यादी.

हे पदार्थ खाऊन लवकर संपवा

अन्न फ्रीजमध्ये ठेवल्याने वेळ वाचतो पण आरोग्यासाठी ते किती सुरक्षित आहे असा प्रश्न पडतो. तर मांस, अंडी , मासे, दुग्धजन्य पदार्थ यांसारखे नाशवंत पदार्थ फ्रीजमध्ये ठेवावेत आणि ते काही दिवसांत अथवा आठवडाभरात वापरावेत. तर ब्रेड, फळे आणि भाज्या यांसारखे लवकर खराब न होणारे पदार्थ जास्त काळ फ्रीजमध्ये साठवता येतात.

कशी रोखावी बॅक्टेरियाची वाढ?

अन्नामध्ये बॅक्टेरिया तयार होऊ नयेत आणि ते वाढून नयेत म्हणून सर्वप्रथम नाशवंत गोष्टी खाव्यात. यानंतर, उरलेले अन्न हवाबंद डब्यात साठवावे किंवा झाकून ठेवावे. तुमचे उरलेले अन्न रेफ्रिजरेटरच्या वरच्या रॅकमध्ये ठेवा जेणेकरून त्याला अधिक हवा आणि थंडपणा मिळेल. शिळे उरलेले अन्न फ्रीजच्या पुढच्या बाजूला आणि ताजे अन्न मागे ठेवावे. आणि ते लवकरात लवकर खाऊन संपवा. तसेत जर अन्नाला आंबट किंवा कोणत्याही प्रकारचा वास येत असेल तर ते अन्न अजिबाक खाऊ नका. ते विषाप्रमाणेच शरीरावर प्रक्रिया करेल.

Follow Us
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!