AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिगारेट सोडल्यानंतर वजन का वाढते? कारणासह उपाय जाणून घ्या

सिगारेट सोडल्यानंतर काही दिवस शरीरात अनेक बदल होतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, धूम्रपान सोडल्यानंतर लोकांचे वजन वाढते. सिगारेट न ओढल्यामुळे काही लोकांना मानसिक ताणही येतो. यामुळे व्यक्ती जास्त खाते. परंतु असे का होते आणि वजन कसे नियंत्रित करावे? तज्ज्ञांकडून याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

सिगारेट सोडल्यानंतर वजन का वाढते? कारणासह उपाय जाणून घ्या
| Edited By: shailesh musale | Updated on: Nov 07, 2024 | 6:41 PM
Share

तुम्ही सिगारेटचे व्यसन सोडले असेल तर सर्वात आधी तुमचं अभिनंदन. पण, यानंतर तुम्हाला अनेक समस्या जाणवत असतील तर ही बातमी परिपूर्ण वाचा. अनेक जण धूम्रपान सोडतात. पण, त्यानंतर काही महिने शरीरात वेगवेगळे बदल दिसून येतात. यात वजन वाढण्याचे प्रमाणही अधिक आहे.

सिगारेटचे सोडल्यानंतर कोणत्या समस्या जाणवतात?

सिगारेटचे व्यसन सोडल्यानंतर पोटदुखीसारख्या समस्याही होऊ शकतात. वैद्यकीयशास्त्रात या समस्यांना विड्रॉल सिंड्रोम म्हणतात. याचा अर्थ असा की नशा सोडल्यानंतर काही काळ शरीरात लक्षणे दिसून येतात. ते फक्त काही दिवस, किमान दोन आठवडे टिकत असले तरी तुम्ही ठीक आहात. या लक्षणांव्यतिरिक्त सिगारेट सोडल्यानंतर अनेकांच्या शरीरात आणखी एक मोठा बदल होतो ते म्हणजे वजन वाढते.

सिगारेटचे सोडल्यानंतर वजन किती वाढते?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार धूम्रपान सोडल्यानंतर बहुतेक लोकांचे वजन वाढते. वजन वाढण्याचा फरक 3 ते 6 किलोपर्यंत असतो. अमेरिकेत झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती धूम्रपान सोडते तेव्हा त्याचे वजन सुमारे 4 ते 6 महिने वाढते, दर महिन्याला वजन एक ते दीड किलोने वाढू शकते, म्हणजेच वजन 6 किलोपर्यंत वाढू शकते. काही लोकांमध्ये हे यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकते.

सिगारेट सोडल्यानंतर भूक का वाढते?

दिल्लीच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन विभागातील एचओडी प्रोफेसर डॉ. एल. एच. घोटेकर सांगतात की, धूम्रपान सोडल्यानंतर निकोटीन शरीरात जाणे बंद होते. निकोटीनमुळे भूक कमी होते, म्हणून जेव्हा आपण धूम्रपान सोडतो तेव्हा भूक वाढते. जास्त खाल्ल्याने वजन वाढते. निकोटीन सोडल्यास चयापचय देखील कमी होते, ज्यामुळे वजन वाढते.

सिगारेट सोडल्यानंतर मानसिक ताण का येतो?

सिगारेट न ओढल्यामुळे काही लोकांना मानसिक ताणही येतो. यामुळे व्यक्ती जास्त खाते आणि त्याचं वजन वाढू लागतं. याचा अर्थ असा नाही की आपण धूम्रपान सोडू नये. सिगारेट सोडायला काहीच हरकत नाही. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी धूम्रपान सोडणे हे एक मोठे पाऊल आहे आणि वजन नियंत्रण देखील सोपे आहे.

वजन नियंत्रित करण्यासाठी काय कराल?

  • निरोगी आहार घ्या: ताजी फळे, भाज्यांचा आहारात समावेश करा
  • दररोज व्यायाम करा: न चुकता रोज व्यायामाची सवय लावा
  • पाणी: दिवसातून कमीत कमी 7 ग्लास पाणी प्या.
  • रोज योगासन करा, ध्यान करा, याचा देखील चांगला परिणाम होतो
  • निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी घ्या

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता