AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tip : ताणतणावात सतत राहिल्यामुळे खरोखरच लठ्ठपणा वाढतो?, जाणून घ्या त्यामागील सत्य!

व्यस्त जीवनशैली आणि अन हेल्दी खाण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्यास सुरूवात होते. शारीरिक हालचाली न करणे, जास्त प्रमाणात खाणे या कारणामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते.

Health Tip : ताणतणावात सतत राहिल्यामुळे खरोखरच लठ्ठपणा वाढतो?, जाणून घ्या त्यामागील सत्य!
लठ्ठपणा
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 2:38 PM
Share

मुंबई : व्यस्त जीवनशैली आणि अनहेल्दी खाण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्यास सुरूवात होते. शारीरिक हालचाली न करणे, जास्त प्रमाणात खाणे या कारणामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते. मात्र, आयुष्यामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे देखील वजन वेगाने वाढते. चला तर ताण घेतल्यामुळे वजन कसे वाढते हे जाणून घेऊयात. (Constant stress leads to weight gain)

तणावामुळे वजन वाढते

होय, तणावामुळे आपले वजन वाढते. जेव्हा आपण तणावात असतो, तेंव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे आपल्या रक्तातील ग्लूकोज बाहेर पडते. यामुळे तुमचे वजन वाढते. तणावामुळे, आपल्याला पुरेशी झोप येत नाही जे शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढवण्याचे मुख्य कारण आहे. तसेच यामुळे तुम्हाला जास्त भूक देखील लागते आणि अन हेल्दी अन्न खाण्याची इच्छा होते.

अनहेल्दी स्नॅकिंग – तणावामुळे आपण आपल्या डोळ्यांसमोर असलेली प्रत्येक गोष्ट खातो. विशेषतः सहजपणे उपलब्ध असलेल्या अशा गोष्टी खायला आवडतात. फास्ट फूड हा आपला आवडता आहार बनतो, ज्यामुळे वजन वेगाने वाढू लागते.

आळस येणे – कोर्टिसोलच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शरीरात सुस्तपणा येतो. यामुळे आपल्याला शारीरिक हालचाली जास्त प्रमाणात करू वाटत नाहीत. शिवाय आपण व्यायाम करणेही यामुळे टाळतो.

ईमोशलन ईटिंग – शरीरातील हार्मोनल बदलांमुळे आपण अती ईमोशलन होतो, ज्यामुळे आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त आहार घेतो.

भूक न लागणे किंवा भूक वाढणे – तणावामुळे आपली भूक कमी होऊ शकते किंवा अधिक होऊ शकते. यामुळे आपण अनियमित जास्त खातो आणि यामुळेच आपले वजन झटपट वाढण्यास सुरूवात होते.

योग्य आहार घ्या – वजन कमी करताना भूकेले राहवे असे बिलकुलच नाही. तर आपल्या आहारात पौष्टिक आहार घ्या. अन्नावर प्रक्रिया केलेल्या गोष्टीऐवजी निरोगी गोष्टी खा. यामुळे आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही.

हायड्रेटेड रहा – पाणी हा उर्जाचा मुख्य स्रोत आहे. हे तुमची पाचक प्रणाली मजबूत करते तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवते. याशिवाय हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. पाणी तुमची भूक शमवते, तसेच शरीर हायड्रेट ठेवते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Constant stress leads to weight gain)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.