AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात तिखट मिरची कोणती? कदाचित तुम्हाला माहितीही नसेल

जगातील सर्वात तिखट मिरची कोणती आहे? तुम्हाला माहिती आहे का? नसेल, तर हा लेख नक्की वाचा! यासोबतच आम्ही तुम्हाला अशा काही १० प्रश्न-उत्तरे सांगणार आहोत, जे तुमच्या ज्ञानात नक्कीच भर घालतील.

जगातील सर्वात तिखट मिरची कोणती? कदाचित तुम्हाला माहितीही नसेल
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 08, 2025 | 12:57 PM
Share

सामान्य ज्ञानाचा खेळ आणि क्विझ हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. रोजच्या जीवनात, शालेय अभ्यासात, स्पर्धा परीक्षेत किंवा मुलाखतीत सामान्य ज्ञान खूप महत्त्वाचे ठरते. तुम्ही कधी विचार केला आहे का, लाल आणि हिरव्या मिरच्या खाल्ल्या असल्या तरी जगातील सर्वात तिखट मिरची कोणती आहे? ही मिरची इतकी तिखट आहे की तिचा स्वाद चाखल्यावर तोंड जळाल्यासारखे होऊ शकते! या लेखात आम्ही तुम्हाला १० महत्त्वाच्या आणि रोचक सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांसह त्यांची उत्तरे सादर करत आहोत, ज्यामुळे तुमचे ज्ञान वाढेल आणि तुम्हाला क्विझमध्ये देखील फायदा होईल.

1. प्रश्न – रॉलेट कायदा कोणत्या वर्षी लागू झाला होता?

उत्तर – ब्रिटीश सरकारने 1919 मध्ये रॉलेट कायदा लागू केला होता. या कायद्यामुळे सरकारला कुठल्याही व्यक्तीला कारण न देता अटक करण्याचा अधिकार मिळाला होता. त्यामुळे या कायद्याला भारतीय जनतेचा तीव्र विरोध झाला होता.

2. प्रश्न – पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कोणते ऑपरेशन सुरू केले होते?

उत्तर – जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. हे ऑपरेशन विशेषतः दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्यासाठी आखले गेले होते.

3. प्रश्न – ‘इन्किलाब झिंदाबाद’ हा नारा कोणी दिला होता?

उत्तर – ‘इन्किलाब झिंदाबाद’ हा क्रांतीसाठी दिला गेलेला प्रसिद्ध नारा आहे, जो महान क्रांतिकारक भगत सिंग यांनी दिला होता. आजही हा नारा तरुणांमध्ये जोश निर्माण करतो.

4. प्रश्न – राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर – स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 12 जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.

5. प्रश्न – पानिपतची तिसरी लढाई कधी लढली गेली होती?

उत्तर – 14 जानेवारी 1761 रोजी लढाई अहमदशहा अब्दाली आणि मराठा साम्राज्य यांच्यात लढली गेली होती. ही भारताच्या इतिहासातील निर्णायक लढायांपैकी एक होती.

6. प्रश्न – कोणत्या राज्य सरकारने इंदिरा सौर गिरि जल विकासम योजना सुरू केली आहे?

उत्तर – तेलंगण, या योजनेचा उद्देश सौरऊर्जेच्या मदतीने ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुनिश्चित करणे आहे.

7. प्रश्न – उदंती सीतानदी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर – उदंती सीतानदी हे छत्तीसगडमधील एक महत्त्वाचे व्याघ्र आरक्षण क्षेत्र आहे, जे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.

8. प्रश्न – SPICED योजना कोणत्या मंत्रालयांतर्गत कार्य करते?

उत्तर – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय ही योजना महिला उद्योजकांना आर्थिक मदत व व्यवसायवाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जाते.

9. प्रश्न – चागोस बेटसमूह कोणत्या महासागरात स्थित आहे?

उत्तर – चागोस बेटसमूह हा हिंदी महासागरात स्थित एक महत्वपूर्ण बेटसमूह आहे.

10. प्रश्न – जगातील सर्वात तिखट मिरची कोणती आहे?

उत्तर – ही मिरची अमेरिकेत तयार करण्यात आली असून तिची तीव्रता स्कोविल स्केलवर 2.2 दशलक्ष युनिट्सपर्यंत आहे. ती जगातील सर्वात तीव्र मिरची म्हणून ओळखली जाते.

Follow Us
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर