AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care Tips : निरोगी राहण्यासाठी या 3 पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, निरोगी जीवन जगण्यासाठी चांगला आहार (Diet) आणि व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या पदार्थांचा (Food) आहारात समावेश करू शकता. यामध्ये लसूण आणि ब्रोकोलीसारख्या अनेक पदार्थांचा समावेश होतो.

Health Care Tips : निरोगी राहण्यासाठी या 3 पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!
या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 12, 2022 | 11:43 AM
Share

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, निरोगी जीवन जगण्यासाठी चांगला आहार (Diet) आणि व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या पदार्थांचा (Food) आहारात समावेश करू शकता. यामध्ये लसूण आणि ब्रोकोलीसारख्या अनेक पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आरोग्याशी (Health) संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत होते. चला जाणून घेऊया आहारात तुम्ही कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकता. विशेष म्हणजे हे पदार्थ आपण वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील आहारामध्ये घेऊ शकतो.

डाळी

डाळी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. डाळींमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि आपले पोट बराच काळ भरलेले राहते. यामुळे डाळी वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. डाळींमुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते. जर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमी असेल तर तुम्ही आहारामध्ये डाळी घ्याव्यात. दररोज किमान एक वाटी डाळींचे आहारात समावेश करा आणि निरोगी जीवन जगा.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये ब्रोकोली, पालक, सैपू, मेथी आणि चुका फायदेशीर आहे, तसे तर प्रत्येक पालेभाजीच आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असते. पालेभाज्यांमध्ये लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात. त्यात कॅल्शियम देखील असते. जर आपल्याला पालेभाजी खाण्यासाठी आवडत नसेल तर आपण हिरव्या पालेभाज्यांच्या रसाचे देखील सेवन करू शकतो.

लसूण

वरण, भाज्या, कढी असे कोणतेही पदार्थ असो लसण टाकल्याशिवाय ते चवदार होत नाहीत. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लसणामध्ये मॅंगनीज, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबरसारखे पोषक घटक देखील असतात. ते अनेक रोग बरे करण्यास मदत करतात. यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते. विशेष म्हणजे लसण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Skin Care : ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हे सोपे आणि घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!

वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर हा हर्बल चहा, जाणून घ्या ‘व्हाईट टी’बद्दल सविस्तर!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली