AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Tips : हीच ती योग्य वेळ वजन कमी करण्याची, अशा प्रकारे उन्हाळ्यात झटपट वजन कमी करा!

सकाळी 8 वाजताच कडक उन्ह (Summer) जाणवत आहे. उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी ही घ्यावी लागते. उन्हाळ्यात आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र, यादरम्यान बरेच लोक बाहेरचे चटपटीत पदार्थ (Food) खाण्यावर अधिक भर देतात.

Weight Loss Tips : हीच ती योग्य वेळ वजन कमी करण्याची, अशा प्रकारे उन्हाळ्यात झटपट वजन कमी करा!
वजन कमी करण्यासाठी योग्य वेळ आहे. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 12, 2022 | 6:29 AM
Share

मुंबई : सकाळी 8 वाजताच कडक उन्ह (Summer) जाणवत आहे. उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी ही घ्यावी लागते. उन्हाळ्यात आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र, यादरम्यान बरेच लोक बाहेरचे चटपटीत पदार्थ (Food) खाण्यावर अधिक भर देतात. यामुळे आपल्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याबरोबरच वजन देखील झपाट्याने वाढण्याची शक्यता 100 टक्के असते. यामुळे या हंगामात बाहेरील खाद्यपदार्थांपासून चार हात लांब राहणेच आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर (Beneficial) आहे. शिवाय निरोगी पदार्थ खाण्यावर भर द्या.

शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी

सूर्यप्रकाशामुळे शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढते. ज्यामुळे आपला मूड चांगला राहतो. या काळात मन खूप चांगले राहते. व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात शरीरात जाते. व्हिटॅमिन डी शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करते. परिणामी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती चांगली वाढते. मॉर्निंग वॉक, व्यायाम, जिम या हंगामात अजिबात बंद करू नका. उलट वजन कमी करण्यासाठी आणि शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी हा हंगाम अतिशय फायदेशीर मानला जातो.

चयापचय गती वाढते

उन्हाळ्यामध्ये आपले शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त गरम राहते. शरीरातील रक्तपेशी योग्य प्रमाणात रक्त पंप करतात आणि संपूर्ण शरीरात वाहून नेतात. परिणामी चयापचय गती वाढते आणि अन्न खूप जलद पचते. तसेच हा वेळ व्यायामासाठी खूप जास्त चांगला आहे. घामाच्या ग्रंथी अधिक सक्रिय असतात. त्यामुळे जास्त कॅलरीज वापरल्या जातात.

कॉफी, चहा कमी होतो

या हंगामात कॉफी, चहा कमी घेतला जातो. हिवाळ्यामध्ये दिवसातून सात ते आठ कप काॅफी आणि चहा घेतला जातो. यामुळे आपले वजन झपाट्याने वाढण्याची शक्यता देखील असते. साखरयुक्त कॉफी किंवा चहा प्यायल्याने तुमचे वजन वाढते. उष्ण हवामानात कमी खाल्ले जाते. हलके, पचायला सोपे पदार्थ जास्त खाल्ले जातात. अन्नाचे प्रमाणही कमी खाल्ले जाते. म्हणूनच वजन कमी होणे इतके जलद होते.

संंबंधित बातम्या : 

Skin care : कडुलिंबाचे हे फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या लगेचच दूर करा!

Food : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काकडीच्या सूपचा आहारात समावेश करा, जाणून घ्या रेसिपी!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली