AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीची झोप उडते, टीबी होतो, प्रमाणाबाहेर हिरव्या मिरच्या खाल्ल्याने आणखी कोणते आजार होतात…

हिरवी मिरची आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी तिचे जास्त सेवन हानिकारक ठरू शकते. अतिसेवनामुळे पोटदुखी, अ‍ॅसिडिटी, तोंडातील जळजळ आणि त्वचेची लालसरता निर्माण होऊ शकते. तसेच, कॅप्सेसिनमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्गाचा धोका वाढतो. हृदयरोग, किडनी स्टोन, वजन वाढ आणि रक्ताची कमतरता हीही दुष्परिणामे असू शकतात. म्हणूनच हिरवी मिरची मर्यादित प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.

रात्रीची झोप उडते, टीबी होतो, प्रमाणाबाहेर हिरव्या मिरच्या खाल्ल्याने आणखी कोणते आजार होतात...
Green Chili Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 04, 2024 | 7:34 PM
Share

आपल्या रोजच्या जेवणात अनेक प्रकारचे पदार्थ बनवत असतो. अनेकदा जेवणात चमचमीत तसेच झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. जेवणाची चव वाढावी याकरिता त्यात अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर आपण करतो. तिखटपणा, रंग आणि चव यासाठी जवळजवळ प्रत्येक पाककृतीमध्ये मसाल्यांचा वापर केला जातो. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या मिरचीचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन करत असाल तर त्याचे घातक परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात.

हिरवी मिरची सामान्यत: सुक्या लाल मिरचीपेक्षा जास्त फायदेशीर मानली जाते. कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. परंतु जर तुम्ही चवीच्या हव्यासापोटी हिरव्या मिरच्यांचे प्रमाणापेक्षा सेवन केलं तर तुम्हाला विविध विकार होऊ शकतात.

हिरव्या मिरच्या जास्त खाण्याचे दुष्परिणाम काय?

हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने पोटदुखी, ॲसिडिटी, जळजळ यांसारखे समस्या उद्भवू शकतात.

दररोजच्या आहारात जर तुम्ही जास्त हिरवी मिरचीचे सेवन केल्यास तोंडातील आतील त्वचा लालसर पडते. तसेच बारीक पुरळ सुद्धा येऊन खूप वेदना होतात.

हिरव्या मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन हे बॅक्टेरियाविरूद्ध आपली प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते. त्यामुळे तुमच्या शरीराला संसर्ग होण्याचा धोका संभवतो.

हिरवी मिरची जास्त खाल्ल्याने असह्य टीबी रोग होऊ शकतो.

हिरवी मिरची खाल्ल्याने रात्रीच्या झोपेवर देखील परिणाम होतो. कारण ते आपल्या शरीरातील पेशींना उत्तेजित करते ज्यामुळे लवकर झोप येत नाही.

हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढून त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो.

हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने वजन नियंत्रित करणे कठीण होऊ शकते.

जर तुम्ही हिरव्या मिरचीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता भासू लागते.

रोजच्या आहारात अधिक प्रमाणात हिरवी मिरची खाल्ली तर शरीरात उष्णता वाढते, ज्यामुळे बहुतेक लोकांना वेदना, सूज आणि इतर समस्या निर्माण होतात.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.