AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीची झोप उडते, टीबी होतो, प्रमाणाबाहेर हिरव्या मिरच्या खाल्ल्याने आणखी कोणते आजार होतात…

हिरवी मिरची आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी तिचे जास्त सेवन हानिकारक ठरू शकते. अतिसेवनामुळे पोटदुखी, अ‍ॅसिडिटी, तोंडातील जळजळ आणि त्वचेची लालसरता निर्माण होऊ शकते. तसेच, कॅप्सेसिनमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्गाचा धोका वाढतो. हृदयरोग, किडनी स्टोन, वजन वाढ आणि रक्ताची कमतरता हीही दुष्परिणामे असू शकतात. म्हणूनच हिरवी मिरची मर्यादित प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.

रात्रीची झोप उडते, टीबी होतो, प्रमाणाबाहेर हिरव्या मिरच्या खाल्ल्याने आणखी कोणते आजार होतात...
Green Chili Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 04, 2024 | 7:34 PM
Share

आपल्या रोजच्या जेवणात अनेक प्रकारचे पदार्थ बनवत असतो. अनेकदा जेवणात चमचमीत तसेच झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. जेवणाची चव वाढावी याकरिता त्यात अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर आपण करतो. तिखटपणा, रंग आणि चव यासाठी जवळजवळ प्रत्येक पाककृतीमध्ये मसाल्यांचा वापर केला जातो. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या मिरचीचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन करत असाल तर त्याचे घातक परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात.

हिरवी मिरची सामान्यत: सुक्या लाल मिरचीपेक्षा जास्त फायदेशीर मानली जाते. कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. परंतु जर तुम्ही चवीच्या हव्यासापोटी हिरव्या मिरच्यांचे प्रमाणापेक्षा सेवन केलं तर तुम्हाला विविध विकार होऊ शकतात.

हिरव्या मिरच्या जास्त खाण्याचे दुष्परिणाम काय?

हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने पोटदुखी, ॲसिडिटी, जळजळ यांसारखे समस्या उद्भवू शकतात.

दररोजच्या आहारात जर तुम्ही जास्त हिरवी मिरचीचे सेवन केल्यास तोंडातील आतील त्वचा लालसर पडते. तसेच बारीक पुरळ सुद्धा येऊन खूप वेदना होतात.

हिरव्या मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन हे बॅक्टेरियाविरूद्ध आपली प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते. त्यामुळे तुमच्या शरीराला संसर्ग होण्याचा धोका संभवतो.

हिरवी मिरची जास्त खाल्ल्याने असह्य टीबी रोग होऊ शकतो.

हिरवी मिरची खाल्ल्याने रात्रीच्या झोपेवर देखील परिणाम होतो. कारण ते आपल्या शरीरातील पेशींना उत्तेजित करते ज्यामुळे लवकर झोप येत नाही.

हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढून त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो.

हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने वजन नियंत्रित करणे कठीण होऊ शकते.

जर तुम्ही हिरव्या मिरचीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता भासू लागते.

रोजच्या आहारात अधिक प्रमाणात हिरवी मिरची खाल्ली तर शरीरात उष्णता वाढते, ज्यामुळे बहुतेक लोकांना वेदना, सूज आणि इतर समस्या निर्माण होतात.

Follow Us
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिवसांवरच आली असता...
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ