AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा-बायकोत भांडण का होतं? तुम्हाला तरी ही 6 कारणं माहीत आहेत काय?

वैवाहिक जीवनात संवादाचा अभाव, पैशांबाबत वाद, मुलांची काळजी आणि वाढता दुरावा हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी, जोडप्यांनी एकमेकांशी खुलेपणाने बोलणे, वित्त व्यवस्थापन करण्यात एकत्र काम करणे, मुलांच्या जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि रोमांच राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

नवरा-बायकोत भांडण का होतं? तुम्हाला तरी ही 6 कारणं माहीत आहेत काय?
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Jan 02, 2025 | 2:56 PM
Share

लग्न ही जीवनातील मोठी गोष्ट आहे. हे नातं जन्मोजन्मीचं असतं. हे नातं निभावताना कधी गोड तर कधी कडू अनुभव येत असतात. पण संसार म्हटलं तर असं चालायचंच. कधी पैशाचा वाद, कधी घरच्यांच्या वागणुकीमुळे होणारे वाद तर कधी शुल्लक वादही या संसारात अनुभवयाला मिळतात. अनेकवेळा काही जोडपे त्याकडे दुर्लक्ष करतात. तर काहींची कडाक्याची भांडणं होतात. पण या समस्यांचे वेळेवर समाधान करून आपण आपल्या नात्याला आनंदी आणि मजबूत बनवू शकतो.

वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. या समस्यांमधून बाहेर येऊन एकमेकांमध्ये प्रेम कसं टिकवून ठेवता येईल हे जाणून घेणंही आवश्यक आहे. जोडप्यांमध्ये तणावाला कारणीभूत असलेली काही कारणं रिलेशनशिप कौन्सिलर सांगतात. ही कारणं कोणती आहेत. हेच आज आपण जाणून घेऊ.

संवादाचा अभाव

नवरा-बायकोच्या नात्यात संवाद असायलाच हवा. संवाद असेल तरच नातं व्यवस्थित राहतं. पण अनेकदा नात्यात संवादाचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे गैरसमज वाढतात आणि त्याचं रुपांतर भांडणात होऊ शकतं. कधी कधी तर, हे नातं तुटण्याचं कारण बनतं. म्हणून, दोन्ही पार्टनर्सनी एकमेकांशी संवाद कायम ठेवला पाहिजे. चांगला संवाद साधण्यासाठी, दोघांनाही एकमेकांना ऐकून घेऊन समजून घेतलं पाहिजे. एकमेकांना टोमणे न मारता, संपूर्ण म्हणणं ऐकून घ्या आणि मगच त्यावर बोला. आपल्याला ऐकलं जातं ही भावना जोडीदाराच्या मनात निर्माण झाली पाहिजे. संवादासाठी वेळ काढा. रात्री झोपताना, संध्याकाळी किंवा चहा पिताना संवाद साधाच.

हिशोबावरून भांडण

जोडीदारावर प्रेम असल्याचं आपण कितीही म्हणत असलो तरी एकत्र राहत असताना पैशांबद्दल बोलणं होतंच. पैसा कुठे खर्च होतो, कुठे खर्च केला अशी विचारणा केलीच जाते. हिशोब विचारल्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. पैशावरून सतत होणारे वाद आणि एकमेकांवरील अविश्वास यामुळे एकमेकांबद्दल अनादर निर्माण होतो. पैशांबद्दल बोलणं महत्वाचं आहे, पण ते तणावाचं कारण होता कामा नये. दोघांनी मिळून घराचं बजेट तयार करायला हवं, आणि एकत्र बचत करायला हवी.

मुलांची काळजी

मुलांची देखभाल करण्यावरूनही अनेकदा वाद होऊ शकतात. एकाला अधिक कामाची जाणीव होणं तणावाचा कारण बनू शकतं. म्हणूनच, दोघांनी मिळून मुलांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. मुलांची काळजी घेण्यासाठी शेड्यूल तयार करा आणि जबाबदाऱ्या वाटून घ्या. कुटुंबातील सदस्यांची किंवा बेबीसिटरची मदत घ्या. एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी वेळ काढा.

नात्यात दुरावा

लग्नाची काही वर्ष एकमेकांचा सहवास चांगला वाटतो. पण नंतर नात्यात हळूहळू दुरावा निर्माण होतो. त्यामुळे जोडप्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते. परिणामी विवाहबाह्य संबंधही निर्माण होतात. म्हणून, जोडप्यांनी वैवाहिक जीवनात रोमांच कायम ठेवायला हवा. वीकेंडवर डेट नाइट प्लान करा, आणि प्रत्येक 3-6 महिन्यांनी व्हॅकेशनचा बेत आखा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आणि एकमेकांना सरप्राईझ द्या.

तणाव आणि परिणाम

आयुष्यात ताणतणाव असतातच. तो आता आयुष्याचा एक भाग बनला आहे. काम, पैसा, आरोग्य किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे नात्यावर तणावाचा परिणाम होऊ शकतो. म्हणून, जोडप्यांनी तणाव दूर करण्यासाठी एकत्र प्रयत्न करायला हवे. एकमेकांना सहकार्य करायला हवे आणि प्रत्येक समस्येचे समाधान शोधलं पाहिजे. ध्यान, योग, चालणे किंवा जॉगिंग करायला हवी. एकमेकांना आधार द्या आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

जास्त अपेक्षा नकोच

कधीही एकमेकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण करू शकतो. तुम्ही माझ्यासाठी हे केलं नाही, तुमची सर्व आश्वासने खोटी होती, तुम्ही असं करायला हवं होतं, तसं करायला हवं होतं, अशा गोष्टी जोडप्यांमध्ये होऊ शकतात. त्याच गोष्टी नंतर भांडणाचं कारणही ठरतात. त्यामुळे एकमेकांकडून अवाजवी अपेक्षा करू नका.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार