AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा-बायकोत भांडण का होतं? तुम्हाला तरी ही 6 कारणं माहीत आहेत काय?

वैवाहिक जीवनात संवादाचा अभाव, पैशांबाबत वाद, मुलांची काळजी आणि वाढता दुरावा हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी, जोडप्यांनी एकमेकांशी खुलेपणाने बोलणे, वित्त व्यवस्थापन करण्यात एकत्र काम करणे, मुलांच्या जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि रोमांच राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

नवरा-बायकोत भांडण का होतं? तुम्हाला तरी ही 6 कारणं माहीत आहेत काय?
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Jan 02, 2025 | 2:56 PM
Share

लग्न ही जीवनातील मोठी गोष्ट आहे. हे नातं जन्मोजन्मीचं असतं. हे नातं निभावताना कधी गोड तर कधी कडू अनुभव येत असतात. पण संसार म्हटलं तर असं चालायचंच. कधी पैशाचा वाद, कधी घरच्यांच्या वागणुकीमुळे होणारे वाद तर कधी शुल्लक वादही या संसारात अनुभवयाला मिळतात. अनेकवेळा काही जोडपे त्याकडे दुर्लक्ष करतात. तर काहींची कडाक्याची भांडणं होतात. पण या समस्यांचे वेळेवर समाधान करून आपण आपल्या नात्याला आनंदी आणि मजबूत बनवू शकतो.

वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. या समस्यांमधून बाहेर येऊन एकमेकांमध्ये प्रेम कसं टिकवून ठेवता येईल हे जाणून घेणंही आवश्यक आहे. जोडप्यांमध्ये तणावाला कारणीभूत असलेली काही कारणं रिलेशनशिप कौन्सिलर सांगतात. ही कारणं कोणती आहेत. हेच आज आपण जाणून घेऊ.

संवादाचा अभाव

नवरा-बायकोच्या नात्यात संवाद असायलाच हवा. संवाद असेल तरच नातं व्यवस्थित राहतं. पण अनेकदा नात्यात संवादाचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे गैरसमज वाढतात आणि त्याचं रुपांतर भांडणात होऊ शकतं. कधी कधी तर, हे नातं तुटण्याचं कारण बनतं. म्हणून, दोन्ही पार्टनर्सनी एकमेकांशी संवाद कायम ठेवला पाहिजे. चांगला संवाद साधण्यासाठी, दोघांनाही एकमेकांना ऐकून घेऊन समजून घेतलं पाहिजे. एकमेकांना टोमणे न मारता, संपूर्ण म्हणणं ऐकून घ्या आणि मगच त्यावर बोला. आपल्याला ऐकलं जातं ही भावना जोडीदाराच्या मनात निर्माण झाली पाहिजे. संवादासाठी वेळ काढा. रात्री झोपताना, संध्याकाळी किंवा चहा पिताना संवाद साधाच.

हिशोबावरून भांडण

जोडीदारावर प्रेम असल्याचं आपण कितीही म्हणत असलो तरी एकत्र राहत असताना पैशांबद्दल बोलणं होतंच. पैसा कुठे खर्च होतो, कुठे खर्च केला अशी विचारणा केलीच जाते. हिशोब विचारल्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. पैशावरून सतत होणारे वाद आणि एकमेकांवरील अविश्वास यामुळे एकमेकांबद्दल अनादर निर्माण होतो. पैशांबद्दल बोलणं महत्वाचं आहे, पण ते तणावाचं कारण होता कामा नये. दोघांनी मिळून घराचं बजेट तयार करायला हवं, आणि एकत्र बचत करायला हवी.

मुलांची काळजी

मुलांची देखभाल करण्यावरूनही अनेकदा वाद होऊ शकतात. एकाला अधिक कामाची जाणीव होणं तणावाचा कारण बनू शकतं. म्हणूनच, दोघांनी मिळून मुलांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. मुलांची काळजी घेण्यासाठी शेड्यूल तयार करा आणि जबाबदाऱ्या वाटून घ्या. कुटुंबातील सदस्यांची किंवा बेबीसिटरची मदत घ्या. एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी वेळ काढा.

नात्यात दुरावा

लग्नाची काही वर्ष एकमेकांचा सहवास चांगला वाटतो. पण नंतर नात्यात हळूहळू दुरावा निर्माण होतो. त्यामुळे जोडप्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते. परिणामी विवाहबाह्य संबंधही निर्माण होतात. म्हणून, जोडप्यांनी वैवाहिक जीवनात रोमांच कायम ठेवायला हवा. वीकेंडवर डेट नाइट प्लान करा, आणि प्रत्येक 3-6 महिन्यांनी व्हॅकेशनचा बेत आखा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आणि एकमेकांना सरप्राईझ द्या.

तणाव आणि परिणाम

आयुष्यात ताणतणाव असतातच. तो आता आयुष्याचा एक भाग बनला आहे. काम, पैसा, आरोग्य किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे नात्यावर तणावाचा परिणाम होऊ शकतो. म्हणून, जोडप्यांनी तणाव दूर करण्यासाठी एकत्र प्रयत्न करायला हवे. एकमेकांना सहकार्य करायला हवे आणि प्रत्येक समस्येचे समाधान शोधलं पाहिजे. ध्यान, योग, चालणे किंवा जॉगिंग करायला हवी. एकमेकांना आधार द्या आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

जास्त अपेक्षा नकोच

कधीही एकमेकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण करू शकतो. तुम्ही माझ्यासाठी हे केलं नाही, तुमची सर्व आश्वासने खोटी होती, तुम्ही असं करायला हवं होतं, तसं करायला हवं होतं, अशा गोष्टी जोडप्यांमध्ये होऊ शकतात. त्याच गोष्टी नंतर भांडणाचं कारणही ठरतात. त्यामुळे एकमेकांकडून अवाजवी अपेक्षा करू नका.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप