AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satyamev Jayate : राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या अशोक स्तंभाच्या खाली लिहिले गेलेले सत्यमेव जयते ‘या’ ग्रंथातून घेण्यात आले, ही आहे त्यामागील कहाणी!

आतापर्यंत आपण अनेकदा "सत्यमेव जयते" हे वाक्य वाचले व लिहिलेले देखील असेल. आपले राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेले असते, जे की आपल्या राष्ट्रातील आदर्श वाक्य आहे, या वाक्याचा अर्थ असा आहे की नेहमी सत्याचा विजय होतो. सत्य नेहमी व्यक्तीला विजय बनवतो आणि म्हणूनच या वाक्याचा अर्थ नुसार प्रत्यक्ष जर मानवाने आपल्या जीवनामध्ये अवलंब केला तर मानवाचे जीवन नेहमी उत्कर्ष प्रगतीशील राहील.

Satyamev Jayate : राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या अशोक स्तंभाच्या खाली लिहिले गेलेले सत्यमेव जयते 'या' ग्रंथातून घेण्यात आले, ही आहे त्यामागील कहाणी!
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 12:27 PM
Share

Satyameva Jayate Origin : देशातील राष्ट्रीय प्रतिकांचा अर्थ व त्यांची ओळख आपण अनेकदा लहानपणी शाळेमध्ये शिकलेलो आहोत. शाळेत अभ्यास करत असताना नागरिक शास्त्रामध्ये राष्ट्रीय प्रतिकांचा अभ्यास प्रत्येकाने केलेला असेल तसेच आपली परंपरा भारताची विविधता आणि एकात्मता या सर्वांच्या दृष्टिकोनातून अनेक असे काही चिन्ह प्रतीके जी आपल्या देशाची परंपरा व मानसन्मान वाढवणारे ठरतात. जसे की आपला राष्ट्रीय झेंडा तिरंगा, राष्ट्रगीत जन गण मन..’ आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम , राष्ट्रीय प्राणी वाघ आणि राष्ट्रीय पक्षी मोर , राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय फळ आंबा आहे. याच पद्धतीने आपले राष्ट्रीय प्रतीक चिन्ह अशोक स्तंभ आहे. सम्राट अशोक द्वारा सारनाथ येथे बनवले गेलेले स्तंभ हे चिन्ह राष्ट्रीय चिन्ह संबोधले गेले आहे. 26 जानेवरी 1950 रोजी भारताचे संविधान स्वीकारल्या गेल्यानंतर या राष्ट्रीय प्रतीकांना स्वीकार केला गेला. खरे तर अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते (Satyamev Jayate) हे वाक्य लिहिलेले असते. हे आदर्श वाक्य खरेतर कोठून शोधण्यात आले यामागील कारण सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे.. हेच कारण आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

अशोक स्तंभ राष्ट्रीय प्रतीक

पोलीस असो की लष्कर सेना यांच्या ड्रेस आणि मेडल्स वर राष्ट्रीय आणि राजकीय इमारतीवर, सिक्के आणि नोटांवर, सरकारी कागद पत्र यांच्यावर, पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळख निर्माण करणारे अन्य डॉक्युमेंट्सवर आपल्या सर्वांना अशोक स्तंभ राष्ट्रीय प्रतीक म्हणून पाहायला मिळते. हा स्तंभ सम्राट अशोकाद्वारा बनवला गेलेला स्तंभ आहे. राष्ट्रीय प्रतीकामध्ये या स्तंभावर चार सिंह आहेत. परंतु समोरून फक्त आपल्या तीन सिंह दृष्टीत पडतात. सोबतच धर्मचक्र सुद्धा त्यावर कोरलेला आहे आणि एक घोडा आणि एक बैल सुद्धा कोरण्यात आलेले आहेत, आता आपण जाणून घेऊया.. हे आदर्श वाक्य “सत्यमेव जयते” याबद्दल काही महत्त्वाच्या बाबी….

पंडित मदन मोहन मालवीय यांची महत्त्वपूर्ण भूमिका

सत्यमेव जयते (Satyameva Jayate) हे भारताचे राष्ट्रीय आदर्श वाक्य मानले जाते त्याचा अर्थ आहे, सत्याचा नेहमी विजय असे म्हटले जाते की सत्यमेव जयते हे वाक्य राष्ट्रपटलावर मान्यता मिळवण्यासाठी आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पंडित मदन मोहन मालवीय यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. सत्यमेव जयते हे सूत्र वाक्य मुण्डक-उपनिषद मधून घेण्यात आले आहे. हे मूळतः मुण्डक-उपनिषद मधील सर्वज्ञात असलेला मंत्र 3.1.6 च्या सुरुवातीचा भाग आहे. मुण्डक-उपनिषद मधील ज्या मंत्राचा हा एक अंश घेण्यात आला आहे तो मंत्र पुढीप्रमाणे आहे. सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः/ येनाक्रमंत्यृषयो ह्याप्तकामो यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्//.

सत्याचाच नेहमी विजय होतो

upanishads.org.in नुसार संपूर्ण मंत्राचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.. सत्याचाच नेहमी विजय होतो, असत्याचा नाही.. सत्य द्वारेच देवांना यात्रा पथचा जो मार्ग आहे तो विस्तीर्ण झाला, ज्या मार्गाचा आपण सर्वांनी उपयोग केला तर आपण आपले अंतिम ध्येय गाठू शकतो तसेच ऋषी गण यांनी या मंत्राचा उपयोग करूनच सत्याच्या आधारे लक्ष परमधाम प्राप्ती केली आहे. उपनिषदचे हे वाक्यांतील अंश ‘सत्यमेव जयते’ हे आदर्श वाक्य म्हणून याचा राष्ट्रीय प्रतीकात समावेश केला गेला आहे. म्हणूनच या वाक्याचा व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा खाजगी स्वरूपामध्ये कोणीही वापरू शकत नाही. हे वाक्य आपल्याला अशोक स्तंभाच्या खाली लिहिलेले पाहायला मिळते भारतीय नोट आणि सिक्कामध्ये सुद्धा आपल्याला राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ सोबत हे वाक्य मुद्रित केलेले आहे.

Nagpur | ओ काट, जरा सांभाळून! नागपुरात आज उड्डाणपुलावरून वाहतूक बंद; कारण काय?

Nagpur elections | मनपा निवडणुकीत वाढणार अडचणी? भूमिपूजनाचे फोटो अपलोड; प्रत्यक्ष कामच नाही!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.