AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दह्यात मीठ घालावं की साखर? काय फायदेशीर? 90 % लोकांना माहित नसेल

दही म्हणजे जेवणातला आणि आरोग्याच्या बाबतला सर्वाच महत्त्वाचा भाग आहे. पण अनेकांना दही खाण्याची योग्य पद्धत माहित नसते. म्हणजे काहींना दही मिठासोबत खाणे पसंत असते, तर काहींना साखरेसोबत. पण यातील कोणती पद्धत सर्वात जास्त फायदेशीर असते जाणून घेऊयात.

दह्यात मीठ घालावं की साखर? काय फायदेशीर?  90 % लोकांना माहित नसेल
Should you eat curd with salt or sugar, The healthiest optionImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Aug 24, 2025 | 8:27 PM
Share

दही म्हटलं की अनेकांच्या आवडीता पदार्थ. जेवणातला आणि आरोग्याच्या बाबतला सर्वाच महत्त्वाचा भाग. अनेकांना तर रोजच्या जेवणात दही हे लागतच. मुख्य म्हणजे दही जेवणाची चव वाढवतं आणि दुसरं म्हणजे आणि पचन सुधारतं. अनेकजण दह्यात काही मिसळून खाण्याऐवजी असचं दही खातात,तर काहीजण दह्यात साखर किंवा मीठ मिसळून खातात. पण नक्की प्रश्न असा आहे की दह्यात मीठ घालावं की साखरं? कोणतं सर्वात जास्त फायदेशीर असतं जाणून घेऊयात.

दही खाण्याची योग्य पद्धत नक्की कोणती?

काही लोक दह्यात साखर घालून खातात, तर काही लोक चव वाढवण्यासाठी मीठ आणि कधीकधी जिरे पावडर किंवा सॅलडमध्ये दही घालून ते खातात. काही गावांमध्ये तर लोक वर्षभर मीठ घालून दही खाणे पसंत करतात, पण ही सवय आरोग्यासाठी चांगली आहे का? दही खाण्याची योग्य पद्धत नक्की कोणती आहे ते जाणून घेऊया.

साखरेसोबत दही खावे की मीठ खावे?

आहारतज्ज्ञांच्या मते साखरेसोबत दही खाणे अधिक फायदेशीर आहे. त्याचबरोबर, गुळासोबत दही खाणे हा देखील एक आरोग्यदायी पर्याय मानला जाऊ शकतो. दुसरीकडे, मीठ घालून दही खाणे टाळावे. जर तुम्हाला ते खायचेच असेल तर जेवताना चवीनुसार थोडे काळे मीठ किंवा खडा मीठ घालावं.

असं दही खाल्लं तर आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, दह्यात मीठ घालून ते जास्त काळ ठेवल्याने त्यात असलेल्या लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियाच्या पेशींवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे दह्याचे पोषक तत्वे कमी होतात. तसेच आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

दुसरीकडे, संधिवात, दमा, सांधेदुखी, मूत्रपिंड आणि सर्दी असलेल्या रुग्णांनी तर दही खाऊच नये. पावसाळ्यात पचनसंस्था कमकुवत होते, म्हणून दही खाणे टाळावं किंवा ते मर्यादित प्रमाणात मर्यादित खावं.

दही खाण्याची उत्तम वेळ

तसेच, दही खाण्याची उत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणात. रात्री कधीही दही खाऊ नये. कारण रात्री दही खाल्ल्याने गॅस, पोटफुगी आणि जडपणा येऊ शकतो. योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात दही खाल्ले शरीरासाठी फायदेशीर असते. आणि जरी रात्रीच्या जेवणात दही खायचेच असेल तर ते नुसतेच खाण्यापेक्षा सॅलेडमध्ये थोडेसे घालून खाऊ शकता.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा