AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापून टाकू…; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याला मध्यरात्री धमक्यांचे फोन, नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्यरात्री वारंवार येणाऱ्या फोनमुळे दानवे यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करत संरक्षणाची मागणी केली आहे.

कापून टाकू...; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याला मध्यरात्री धमक्यांचे फोन, नेमकं काय घडलं?
Ambadas Danve Death Threat
| Updated on: Mar 16, 2026 | 10:49 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून अंबादास दानवे यांना मध्यरात्रीच्या सुमारास सातत्याने धमक्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल क्रांती चौक पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NC) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १२, १३ आणि १४ मार्च रोजी त्यांना अज्ञात नंबरवरून सतत फोन येत होते. १५ मार्च रोजी रात्री १ वाजून ५४ मिनिटांनी पुन्हा फोन आला. ज्यामध्ये तुला कापून टाकू, ठोकून टाकू अशी थेट धमकी देण्यात आली. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे दानवे यांनी अखेर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

विशेष म्हणजे, विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या महिन्यातच अंबादास दानवे यांची सरकारी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या संरक्षणाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती दानवे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

एकाच फोनवरुन वारंवार फोन

अंबादास दानवे यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मागच्या ३ ते ४ दिवसांपासून मला सतत फोन येत आहे. मला अशा फोनची सवय आहे. अनेक जण मला जाब विचारायला फोन करतात. तुम्ही असं का केलं, तसं का केलं, असं मला विचारत असतात. पण ते तेवढ्यापुरतं असतं. आम्ही त्यांच्या फार काही नादी लागत नाही. हे रोजचचं आहे. पण गेल्या आठवड्यात दर दोन तीन दिवस रात्री ११, १२, १, २, २.३० वाजता मला धमकीचे फोन येत होते. एकाच फोनवरुन वारंवार फोन येत होते. मी तीन दिवस त्याची काही दखल घेतली नाही.

पण चौथ्या दिवशी मला असं वाटलं की आपण याबद्दल तक्रार करुन ठेवावी. एक खबरदारी म्हणून पोलिसात तक्रार केली. मी धमक्यांना घाबरत नाही. पोलिसांना नंबरसहित या तक्रारीची माहिती दिली आहे. ते मला जीवे मारण्याची धमकी असं बोलले आहेत. पण मला याची सवय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित फोन नंबर कोणाचा आहे, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.

Follow Us
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.