AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा, पार्टनर, बॉयफ्रेंड नकोच… महिलांना सिंगल राहायला का आवडतं? काय आहेत कारणं?

आधुनिक महिला स्वातंत्र्याला प्राधान्य देत एकांगी राहणे पसंत करतात. नातेसंबंधातील तणाव, बांधिलकीची कमतरता, स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण आणि स्वातंत्र्याची इच्छा हे यामागील प्रमुख कारणे आहेत. प्रवास, करिअर, वैयक्तिक वाढ आणि मित्रपरिवार यावर त्यांना अधिक लक्ष केंद्रित करायचे असते. त्यांच्या या निवडीला समाजाने आदर देण्याची गरज आहे.

नवरा, पार्टनर, बॉयफ्रेंड नकोच... महिलांना सिंगल राहायला का आवडतं? काय आहेत कारणं?
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Nov 20, 2024 | 3:34 PM
Share

आपल्याला आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी आयुष्यात पुरुष हवाच असं प्रत्येक महिलेला वाटत नाही. काळानुसार आता महिलांची विचार करण्याची पद्धतही बदलू लागली आहे. आता महिलांना स्वातंत्र्य महत्त्वाचं वाटत आहे. अनेक महिलांना पुरुषांसोबत काहीही घेणं-देणं नसतं. सिंगल असणं म्हणजे काही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे, असं त्यांना वाटत नाही. प्रत्यक्षात, काही महिलांसाठी अशा प्रकारचे नातेसंबंध फक्त एक नाटकच असते. त्यापेक्षा काहीही नाही. त्यांच्यासाठी हे सर्व सांभाळणं खूप गुंतागुंतीचं असतं.

महिलांना सिंगल राहणं का आवडतं? कोणत्याही बंधनात अडकायला का आवडत नाही? त्या मागची कारणं काय आहे? खरोखरच महिला एकट्या राहू शकतात का? महिलांच्या एकट्या राहण्याच्या मानसिकते मागची कारणे काय आहेत? यावर टाकलेला हा प्रकाश.

फक्त स्वतंत्र राहू इच्छितात

हळूहळू, नातेसंबंध एका प्रकारच्या दिनचर्येत बदलतात. काही लोकांना फक्त आराम हवा असतो. पण काही मुक्त आणि उत्साही महिला एकाच नात्यात रोजची एकसारखी दिनचर्या स्वीकारू शकत नाहीत. या महिलांना आयुष्यात रोमांच हवा असतो. ज्या महिलांना जीवनसाथीसोबत राहायचं नाही त्यांना कुटुंब ठरवण्याचाही विचार असतो, हे आपल्या समाजाने स्वीकारण्याची वेळ आली आहे. आपल्याला जोडीदार असावा असं अनेक महिलांना आता वाटत नाही. त्यांना एकटं राहण्यातच आनंद वाटतो. कारण त्यामागे स्वातंत्र्याची भूमिका असते. महिलांना स्वातंत्र्य प्रिय वाटू लागलं आहे. कोणत्याही बंधनात अडकणं त्यांना नकोसं झालं आहे.

तणाव नकोच

डेटिंग काही लोकांसाठी वेदनादायक आणि तणावपूर्ण असू शकतं. आणि काही महिलांना डेटिंगच्या नावाखाली होणारा तणाव सहन करायचा नाहीये, त्यांना अशा वेदनादायक आणि तणावपूर्ण परिस्थितीमध्ये जगायचं नाही. त्यामुळे त्या सिंगल राहणं पसंत करतात. काही महिलांना वाईट नात्यात प्रवेश करण्याचा धोका नको असतो, कारण त्या त्यांच्या जीवनात कोणताही तणाव येऊ देऊ इच्छित नाहीत. वाद, सहनिर्भरता, भावनिक ओझं – या सर्व गोष्टी त्या महिला आपल्या आयुष्यात फिरकू देत नाहीत.

कमिटेड होणं आवडत नाही

काही सिंगल महिलांना डेटिंग करायला आवडत असलं तरी, त्या गंभीर किंवा बांधिलकी असलेल्या नात्यात गुंतून जाण्याचा विचार करत नाहीत. लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या कोणत्याही गोष्टीत त्यांना इंटरेस्ट नसतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेगवेगळ्या आवड असतात. त्यामुळेच आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत राहण्याची कल्पनाच त्यांना झेपत नाही. कधी कधी, काही महिलांना जास्त स्पेसची आवश्यकता असते आणि त्या कोणासोबतही बांधिल होऊ इच्छित नाहीत.

अविवाहीत राहणं आवडतं

अशा महिलांना ज्यांना अविवाहित राहणं आवडतं, त्यांना पूर्ण जीवन जगण्यासाठी पुरुषाची आवश्यकता वाटत नाही. त्यांच्याकडे आयुष्यात आनंद घेण्यासाठी इतरही गोष्टी आहेत. प्रवास करणे, मित्रांसोबत बाहेर जाणे, लोकांची छेडछाड करणे, एक यशस्वी करियर तयार करणे, इत्यादी गोष्टी त्यांना नात्यात राहण्यापेक्षा जास्त उत्साहित करतात. प्रत्येकाची पसंती वेगळी असते आणि पारंपरिक विवाह जीवन काही महिलांच्या प्राथमिकतेत नाही.

Follow Us
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.