AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय चहाचा रंग फिका, कीटकनाशकांमुळे अनेक देशांनी आयात थांबवली, चहा उत्पादक चिंतेत…

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातून भारतीय चहाची खेप परत केल्यानंतर त्याच्या किमतीत घट झाली आहे. चहाच्या पानात कीटकनाशके आणि रसायनांचे प्रमाण जास्त असल्याने खरेदीदारांनी ते घेण्यास नकार दिला.

भारतीय चहाचा रंग फिका, कीटकनाशकांमुळे अनेक देशांनी आयात थांबवली, चहा उत्पादक चिंतेत...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jun 07, 2022 | 8:31 PM
Share

मुंबई : चहापत्तीमध्ये कीटकनाशके आणि रसायनांची मर्यादा ओलांडल्याचे आढळून आल्यानंतर आता चहाच्या (Tea) निर्यातीवर (Export) मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. अनेक ग्राहकांनी भारतीय चहाला घेण्यास नकार दिला असल्याने याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पडताना दिसून येत आहे. मागणीत घट झाल्याने भारतीय चहा उत्पादकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय (International) आणि देशांतर्गत बाजारातून भारतीय चहाची खेप परत केल्यानंतर त्याच्या किमतीत घट झाली आहे. चहाच्या पानात कीटकनाशके आणि रसायनांचे प्रमाण जास्त असल्याने खरेदीदारांनी ते घेण्यास नकार दिला. आता चहाचे दर किलोमागे ३० ते ४० रुपयांनी घसरल्याने उत्पादकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

महिन्यात 27 रुपयांची पडझड

गेल्या एका महिन्यात चहाच्या किमतीत 27 रुपयांची घट झाली असून किंमत प्रतिकिलो 214 वरून 187.06 प्रतिकिलोवर आली आहे. यामुळे दुसऱ्या हंगामात चहाच्या किमती आणखी कमी होण्याची भीती उत्पादकांना आहे. देशाबाहेरील निर्यात घटल्याने याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम चहा उद्योगावर होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. देशात विकली जाणारी सर्व प्रकारची चहा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या (FSSAI) मानदंडांचे पालन करत असल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी, चहाच्या पानांमध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त कीटकनाशके आणि रसायने आढळून आल्याने चहा व्यापाऱ्यांनी आपली खरेदी रद्द केली. ‘बिझनेस लाइन’नुसार, कोलकाता लिलावात खरेदीदारांनी सुमारे 39 हजार किलो चहा परत पाठविला आहे. गतवर्षी 226.77 रुपये किलो दराने चहा विकला गेला होता, मात्र यंदा त्याचा सरासरी भाव 186.41 रुपये किलो आहे.

एका रिपोर्टनुसार, चहाच्या किमती घसरल्याचा कीटकनाशके आणि रसायनांच्या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय चहाची मागणी कमी आहे. केनियामध्ये चहाच्या कमी किमतीमुळे भारतीय चहाची मागणी घटली आहे. चहामध्ये अधिक कीटकनाशके आणि रसायने आल्याने निर्यात कमी झाली, तर देशांतर्गत बाजारातही चहाचे दर घसरतील, असे सांगण्यात आले आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे, भारतीय चहा उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला व्यवसाय वाढवण्याची मोठी संधी होती, परंतु मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात कीटकनाशके आणि रसायनांचा वापर केल्याने मोठा फटका बसल्याचेही बोलले जात आहे.

कीटकनाशकांचा वापर वाढला

हवामान बदलामुळे चहाच्या पानांवर किडींचा हल्ला वाढला आहे. त्यामुळे कीटकांपासून संरक्षण मिळविण्यासाठी चहाच्या बागांमध्ये कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. कीटकनाशकांचा पानांवर काही प्रमाणात अंश राहत असल्याने कीटकनाशकांचा वापर झाल्यानंतरच पाने तोडली जातात. कीटकनाशक फवारल्यानंतर साधारणतः 10 ते 20 दिवसांनी पाने तोडली जातात. असे न केल्यास साहजिकच पानांमध्ये कीटकनाशकांचे अंश जास्त प्रमाणात दिसून येत असते. 25 मे रोजी भारतीय चहा मंडळाने सर्व उत्पादक आणि एजंट यांना याबाबतचे निरीक्षण करण्याचे निर्देश जारी केले होते.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?