AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे 3 पदार्थ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत; पोटाच्या समस्या वाढवू शकतात

सकाळीच सुरुवात, सकाळची दिनचर्या ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. तसेच नाश्ताची पद्धतही वेगळी असते. पण सकाळची सुरुवात कोणत्या पदार्थाने आपण करतो त्यावर पुढचा संपूर्ण दिवस ठरतो. पण असे 3 पदार्थ आहेत जे कधीही सकाळी खाऊ नयेत. अन्यथा पोटाच्या समस्या निर्माण होतील.

हे 3 पदार्थ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत; पोटाच्या समस्या वाढवू शकतात
These 3 foods should never be eaten on an empty stomach; they can increase stomach problemsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2025 | 2:44 PM
Share

सकाळी प्रत्येकाची दिनचर्या ही वेगवेगळी असते. अनेकजण हलका नाश्ता घेऊन दिवसाची सुरुवात करतात. तर काहींना सकाळी फ्रेश झाल्याबरोबर पहिला चहा लागतो ती लोक चहाने सकाळ सुरुवात करतात. तर अनेकजण कॉफी घेतता. तर काहीजण फळांनी दिवसाची सुरुवात करतात. पण असे काही पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी कधीच खाल्ले नाही पाहिजेत. अन्यथा पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जसं की, आम्लता, पोटफुगी आणि ऊर्जा कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

तज्ज्ञांच्या मते सकाळी उठल्यानंतर लगेच खाल्लेले काही पदार्थ पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात आणि दिवसभर त्याचा परिणाम तुमच्या उर्जेच्या पातळीवर होतो. तज्ज्ञांच्या मते, हे तीन पदार्थ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत. कारण ते तुमच्या आतड्याच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊयात की असे कोणते 3 पदार्थ आहेत जे सकाळी कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत.

आंबट फळे

सकाळी उठल्यानंतर आंबट फळे खाणे टाळावे जसंल की, संत्री आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीने समृद्ध आणि आरोग्यदायी असतात, परंतु रिकाम्या पोटी ती खाणे योग्य नाही. ते जास्त आम्लयुक्त असल्याने पोटाला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे आम्लपित्त, छातीत जळजळ आणि गॅस होऊ शकतो. ज्यांना आधीच पोट किंवा आम्लपित्त समस्या आहेत त्यांनी सकाळी ही फळे टाळावीत.

ब्लॅक कॉफी

अनेकांना दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने करायला आवडते. सकाळी ऊर्जा वाढवण्यासाठी अनेकांना कॉफी आवडते, परंतु रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणे अ‍ॅसिड निर्माण करू शकते. ब्लॅक कॉफी अचानक पोटातील अ‍ॅसिड वाढवते, ज्यामुळे केवळ छातीत जळजळच नाही तर पोट फुगणे, अस्वस्थता आणि ऊर्जा कमी होते. शिवाय, कॉफीमध्ये कॅफिन असते, जे शरीरात कॉर्टिसोल, स्ट्रेस हार्मोन वाढवते, जे शरीराचे नैसर्गिक ऊर्जा संतुलन बिघडू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कधीही ब्लॅक कॉफी घेऊ नये.

जड, तळलेले पदार्थ

सकाळी जड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर अनावश्यक ताण पडतो. यामुळे गॅस, अपचन आणि दिवसभर जडपणा जाणवू शकतो. तळलेले पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट आणि मसाल्यांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटफुगी आणि आम्लता वाढू शकते. त्यामुळे सकाळी कामात सुस्तपणा आणि थकवा देखील निर्माण करतात.

मग दिवसाची सुरुवात कशाने करावी? जेणे करून तुम्ही ताजेतवाने राहाल, ऊर्जेने भरपूर राहाल शिवाय आरोग्यालाही फायदेशीर असेल. जाणून घेऊयात.

दिवसाची सुरुवात कशी करावी?

दिवसाची सुरुवात हलक्या आणि पौष्टिक पदार्थाने करणे चांगले. ब्रेड त्यात ब्राऊन ब्रेड योग्य आणि ऑम्लेट, इडली आणि सांबार, डोसा आणि सांबार, पोहे, उकडलेली अंडी, केळी किंवा सफरचंद अशा हलक्या नाश्ताने सकाळची सुरुवात करावी. तसेच भिजवलेले काजू, ओट्स किंवा केळी देखील आतड्यांच्या आरोग्यास मदत करते. तुम्ही उठताच लिंबू पाण्याऐवजी कोमट पाणी किंवा साधे पाणी देखील पिऊ शकता, जे शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करते आणि पचन सुधारते.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.