AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात भाज्या भरपुर दिवस टिकवण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वोत्तम मार्ग

पावसाळ्यात भाज्या खराब होत असतात. कारण या ऋतूत ओलाव्यामुळे भाज्या खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी भाज्या टिकवण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात भाज्या कशा टिकवायचा...

पावसाळ्यात भाज्या भरपुर दिवस टिकवण्यासाठी 'हे' आहेत सर्वोत्तम मार्ग
पावसाळ्यात भाज्या भरपुर दिवस टिकवण्यासाठी 'हे' आहेत सर्वोत्तम मार्गImage Credit source: (Photo: Getty Images)
| Edited By: | Updated on: Jun 21, 2025 | 10:05 PM
Share

पावसाळा सुरू झाला की अनेकजण हा मान्सून मस्त एन्जॉय करतात. पण हा ऋतू जितका आल्ल्हाददायक वाटतो तितकाच समस्या निर्माण करणारा देखील आहे. पावसाळ्यात आरोग्यासोबच खाण्यापिण्याच्या समस्या देखील जास्त पाहायला मिळतात. पावसाळ्यात सर्वात जास्त टेन्शन म्हणजे भाजीपाला टिकवणे. कारण पावसाळ्यात भाजीपाला भिजल्याने लवकर खराब होतो. अशातच पावसाळ्याच्या दिवसात वारंवार बाहेर जाऊन भाजीपाला आणणे शक्य नसते. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने भाज्या फक्त आठवडाभर नाहीतर 15 दिवस टिकून राहील.

1. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारातून विकत घेतलेल्या भाज्या नीट धुवा कारण या ऋतूत ओलाव्यामुळे भाजींवर बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. यासाठी भाज्या फक्त पाण्याने स्वच्छ करण्याऐवजी पाण्यात व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा टाकून त्याने स्वच्छ करा. यामुळे भाज्यांवर असलेली घाण मोठ्या प्रमाणात निघून जाते.

2. भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी भाज्यामधील पाणी पूर्णपणे काढा व कोरडया करा. यासाठी तुम्ही भाज्या पुसण्यासाठी सुती कापड किंवा पेपर टॉवेलचा वापर करू शकता. यामुळे भाज्या व्यवस्थित स्वच्छ होतील. त्या पॉलिथिनमध्ये किंवा बाजारातून आणलेल्या पिशव्यांमध्ये ठेवण्याची चूक करू नका. तर या दिवसात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी आणि दिर्घकाळ टिकवण्यासाठी पेपर टॉवलेमध्ये गुंडाळून ठेवा.

3. लसूण जास्त काळ टिकण्यासाठी हवाबंद पिशवीत तुम्ही त्यात चहाची पाने टाकून ठेवू शकता. असे केल्याने त्याचे लसून बराच दिवस टिकतो आणि लवकर सुकत नाही किंवा खराब होत नाही.

4. पावसाळ्यात कांदा बरेच दिवस टिकून राहावा यासाठी वर्तमानपत्राचे तुकडे कांद्यामध्ये ठेवा. यामुळे कांदा खराब होण्याचा धोका कमी होतो आणि पावसाळ्यात लवकर खराब होत नाही.

5. आले जास्त काळ टिकवण्यासाठी हळदीच्या पाण्यात बुडवा आणि सुकल्यानंतर पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि फ्रीजमध्ये ठेवा.

6. टोमॅटो जास्त काळ टिकवण्यासाठी तुम्ही त्यांची हिरवी पाने काढून त्याच्या वरच्या भागावर टेप लावू शकता. यामुळे टोमॅटो लवकर मऊ होत नाही आणि कुजण्यापासून वाचतात.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.