AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फळं आणि भाज्यांची सालं डायरेक्ट कचरापेटीत टाकण्याआधी पु्न्हा विचार करा, ‘या’ सालांमुळे मिळते त्वचेला चमक !

भाज्या आणि फळांच्या सालींचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेवर चमक आणू शकता. त्यासाठी कोणत्या भाज्या व फळांची सालं वापरू शकता, ते जाणून घेऊया.

फळं आणि भाज्यांची सालं डायरेक्ट कचरापेटीत टाकण्याआधी पु्न्हा विचार करा, 'या' सालांमुळे मिळते त्वचेला चमक !
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 27, 2023 | 2:16 PM
Share

नवी दिल्ली – चांगल्या आरोग्यासाठी आपण सर्वजण नियमितपणे फळं आणि भाज्यांचे (fruits and vegetables) सेवन करतो. पण हीच फळ व भाज्या आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. कसं ते माहीत आहे का? फळ आणि भाज्यांच्या सालीचा (vegetable peels) वापर त्वचेवर चमक आणण्यासाठी केला जाऊ शकतो. ही सालं अनेक प्रकारे वापरता येतात. त्यामुळे सालं फेकून देण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा. फळे आणि भाज्यांच्या सालीमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात, जे तुमच्या त्वचेला (skin care) पोषण देऊ शकतात. यामुळे मुरुम, मुरुम, सुरकुत्या इत्यादी दूर होऊ शकतात. आज आपण अशाच काही फळ आणि भाज्यांबद्दल जाणून घेऊया ज्याची सालं फायदेशीर ठरतात

संत्र्याचे साल

संत्र्याच्या सालीचा वापर करून तुम्ही त्वचेवर चमक आणू शकता. यासाठी संत्र्याची काही साले उन्हात वाळवल्यानंतर ती चांगली बारीक करून पावडर तयार करा. आता ही पावडर तुमच्या फेस पॅकमध्ये मिसळा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे तुमची त्वचा सुधारेल.

डाळिंबाचे साल

डाळिंबाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे त्वचेवरील डाग आणि सुरकुत्यांची समस्या दूर होते. यासाठी डाळिंबाची साल उन्हात वाळवून त्याची पावडर तयार करावी. यानंतर या पावडरमध्ये मध आणि गुलाबजल मिसळून चेहऱ्याला लावावे. त्याच्या मदतीने तुम्ही त्वचेवर नैसर्गिक चमक मिळवू शकता. तसेच, डाग, सुरकुत्या यांसारख्या समस्या दूर करू शकतात.

बटाट्याचे साल

तुम्ही चेहऱ्यावर बटाट्याचे साल वापरू शकता. यामुळे त्वचेचा टोन सुधारू शकतो. यासाठी बटाट्याचे सालं काढून ते वाळवून बारीक करावे व त्यात थोडी चंदन पावडर मिसळावी. नंतर त्यामध्ये थोडं गुलाब पाणी आणि कोरफड जेल मिक्स करून चेहऱ्याला लावावे. याचा त्वचेला खूप फायदा मिळतो तसेच काळेपणाही दूर होतो.

पपईचे साल

पपई पचनासाठी खूप चांगली असते. तसंच त्वचेला चमक येण्यास मदत होते. यामुळे तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर होऊ शकतो. ते वापरण्यासाठी पपईचे साल काढून ते उन्हात वाळवा आणि बारीक करून घ्या. नंतर त्यामध्ये थोडं दही आणि मध मिसळून फेसपॅक बनवा. यामुळे त्वचा चमकदार होईल. तसेच त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते.

काकडीचे साल

काकडीचे सालही त्वचेसाठी खूप चांगली ठरते. यासाठी तुम्ही काकडीची साले थेट चेहऱ्यावर चोळू शकता. याशिवाय तुम्ही ही साले सुकवून फेस पॅक म्हणूनही वापरू शकता. ते तुमच्या त्वचेला पोषण आणि आर्द्रता देऊ शकते.

भाज्या आणि फळांच्या सालीचा तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो. पण तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.