AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food | शिळा भात-बटाटा-अंडी खाताय? थांबा! आधी वाचा याचे दुष्परिणाम…

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शिळ्या खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Food | शिळा भात-बटाटा-अंडी खाताय? थांबा! आधी वाचा याचे दुष्परिणाम...
अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शिळ्या खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
| Updated on: Jan 28, 2021 | 5:09 PM
Share

मुंबई : बरेच लोक उरलेले अन्न दुसर्‍या दिवशी गरम करून खातात. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, काही शिळ्या गोष्टी खाण्याने आपण आजारी पडू शकता. म्हणून नेहमी ताजे अन्न खावे. शिळे अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शिळ्या खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात (this leftover food can make you sick).

अंडी

डॉक्टर कांता शेळके यांनी रीडर डायजेस्टला दिलेल्या माहितीत सांगितले की, ‘अंड्यांमध्ये सर्वाधिक साल्मोनेला असतो.’ साल्मोनेला हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. जो कच्च्या किंवा अर्धवट शिजलेल्या अंड्यात आढळतो. यामुळे ताप, पोटाचा त्रास किंवा अतिसार सारख्या समस्या उद्भवू शकतात. बरेच लोक अंडी कमी उष्णतेवर शिजवतात, ज्यामुळे त्यातील जीवाणू पूर्णपणे मरत नाहीत आणि पदार्थ शिळे झाल्यावर ते दुप्पट वाढतात.

बटाटा

डॉक्टर शेळके यांच्या मते बटाटे शिजवल्यानंतर बराच वेळ थंड होण्यासाठी ठेवले तर त्यात क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाच्या बॅक्टेरियांची पैदास होते. या जीवाणूंमुळे बोटुलिझम रोग होऊ शकतो. ज्यामुळे अंधुक दृष्टी, कोरडे तोंड आणि श्वास घेण्यास अडचण यासारख्या समस्या उद्भवतात. हा आजार सामान्यतः मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. याचप्रमाणे बटाटे मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करता कामा नये.

पालक

पालकात भरपूर प्रमाणात नायट्रेट असते, जे शिजवल्यावर कॅन्सरोजेनिक नायट्रोसामाइन्स बनते. म्हणून, शिळा पालक पुन्हा गरम करून खाणे टाळा. आरोग्य तज्ज्ञ पालक कच्चा किंवा हलका शिजवून खाण्याची शिफारस करतात. नायट्रेट्स असलेले कोणतेही पदार्थ पूर्ण शिजवून खाऊ नयेत.

उरलेला भात

शिजवलेला तांदूळ अर्थात भात बर्‍याच काळासाठी रूम टेम्प्रेचरवर ठेवल्यामुळे त्यामध्ये बॅसिलस सेरियस बॅक्टेरिया वाढू लागतात. त्यामुळे उरलेला शिळा भात अन्न विषबाधा अर्थात फूड पॉयझनिंग होऊ शकते. भात बनवल्यानंतर काही तासातच तो संपवण्याचा प्रयत्न करा (this leftover food can make you sick).

चिकन

कच्च्या अंडीप्रमाणे कच्च्या कोंबडीमध्येही साल्मोनेला बॅक्टेरिया असतात आणि बराच काळ ठेवल्यास हे बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. हे टाळण्यासाठी प्रथम कोंबडीचे मांस चांगले शिजू द्यावे. मायक्रोवेव्ह केवळ कोंबडीचे मांस गरम करते, ते व्यवस्थित शिजवत नाही. त्यामुळे त्यातील जीवाणू पूर्णपणे काढून टाकले जात नाहीत.

तेलकट पदार्थ

तेलकट पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यांच्यात हानिकारक रसायने तयार होतात. जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. जर तुम्हाला ते खायचेच असेल तर एकतर ते गरम न करताच खावे किंवा मंद आचेवर गरम करावे.

सीफूड

खराब सीफूड खाद्य खाल्ल्यास अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, उच्च तापमानात वारंवार सीफूड गरम केल्याने त्यात बॅक्टेरिया उद्भवू शकतात. त्यामुळे दोन तासांपेक्षा जास्त वेळ सीफूड बाहेर ठेवू नये.

(this leftover food can make you sick)

हेही वाचा :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.