AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story | महाराष्ट्रातलं ‘कैलास’, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं ‘भीमाशंकर’

महाराष्‍ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात 'भीमाशंकर' हे तीर्थक्षेत्र आहे.

Special Story | महाराष्ट्रातलं 'कैलास', सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं 'भीमाशंकर'
महाराष्‍ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात 'भीमाशंकर' हे तीर्थक्षेत्र आहे.
| Edited By: | Updated on: Jan 30, 2021 | 8:26 AM
Share

मुंबई : संपूर्ण महाराष्‍ट्रला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यातल्या त्यात पर्यटनाच्या दृष्टीने विचार केल्यास महाराष्‍ट्र खूप समृद्ध आहे. महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैका पाच आपल्या महाराष्‍ट्रात आहे. ‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग त्यापैकीच एक आहे. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरला ‘चंद्रभागा’ म्हणून ओळली जाणारी भीमा नदी चक्क शिवलिंगातून प्रकट झाली आहे. त्यामुळे अतिशय घनदाट जंगलात असलेले भीमाशंकर तीर्थक्षेत्र आता महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे(Travel Special story on Bhimashankar trek).

महाराष्‍ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात ‘भीमाशंकर’ हे तीर्थक्षेत्र आहे. शिवशंकर अर्थात महादेवाच्या घामातून भीमा नदी प्रकट झाल्याचा उल्लेख शिवपुराणात आढळतो. भीमा नदी ही दक्षिण-पश्चिम वाहणारी असून, रायपूर जिल्ह्यात ती कृष्णा नदीला मिळते. विशेष म्हणजे पंढरपूरला ती ‘चंद्रभागा’ म्हणून ओळखली जाते.

घनदाट भीमाशंकर अभयारण्य!

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले असल्याने हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 3250 फूट उंचीवर आहे. 1984 साली या घनदाट जंगलाची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.

भीमाशंकरची पदभ्रमंती

निसर्गसौंदर्याने नटलेले भीमाशंकर, सदाहरित जंगलामुळे या परिसरात पदभ्रमण करणे हा वेगळाच सुखद अनुभव आहे. पावसाळ्यात तर त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. हिरव्याकंच पर्णभाराने लगडलेल्या वृक्षांवर गोड कूजन करणारे बुलबुल, फुलाफुलांवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, आकर्षक रंगांनी मन आकर्षित करून घेणारे तऱ्हेतऱ्हेचे कीटक, या सर्वांचे निरीक्षण करणे हा एक विलक्षण अनुभव असतो. रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्‍चर्य नाही. हिवाळ्यात धुक्‍याच्या तरल पडद्याआडून हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून टाकते. या संपूर्ण परिसराला लाभलेल्या हिरव्या कोंदणामुळे या पवित्र भूमीला भाविकांबरोबरच निसर्गप्रेमींचाही स्वर्ग म्हणायला हरकत नाही.

‘भीमाशंकर’ नावाचा इतिहास

इतर स्थळांप्रमाणे या ठिकाणी पौराणिक गोष्टी व त्यावरून पडलेले या ठिकाणाचे नाव यामागची कथा ऐकायला मिळते. पुराणात त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी येथे आले असता तेथे अयोध्येचा ‘भीमक’ नावाचा राजा तप करीत होता. भगवान शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याने ‘शंकराला आलेल्या घामाच्या धारांची नदी होऊ दे’, असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. दुसरी अजून एक अशीच कथा सांगितली जाते की, त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागात फारच धुमाकूळ घातला होता. त्याचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी प्रचंड असे ‘भीमरूप’ धारण केले. अनेक रात्र चाललेल्या या युद्धात त्रिपुरासूराचा वध झाला. त्यावेळी भगवान शंकर घामाघूम होऊन येथील शिखरावर बसले. त्यांच्या अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारेतून ‘भीमा’ नदी उत्पन्न झाली (Travel Special story on Bhimashankar trek).

Bhimashankar

काय काय पाहाल?

गुप्त भीमाशंकर

भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किमी पूर्वेला पुन्हा प्रकट होते, असे मानले जाते. ही जागा ‘गुप्त भीमाशंकर’ म्हणून ओळखली जाते.

कोकण कडा

भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारण 1100 मीटर इतकी आहे. येथून निसर्गाचे विलक्षण रूप पाहायला मिळते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.

सीतारामबाबा आश्रम

कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते

नागफणी

आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून 1230 मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.

कसे पोहोचाल?

भीमाशंकरला रस्त्याने जायला पुणे-नगर रस्त्यावरच्या मंचरला फाटा आहे. मुंबईहून हे अंतर अडीचशे-पावणेतीनशे किमी इतके आहे. पुण्याहून भीमाशंकर 168 किमी आहे. मुंबईहून जायला दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कल्याणनगर रस्त्याने मुरबाड, माळशेज घाट पार करत आळेफाटा गाठायचे. पुढे पुण्याच्या दिशेला असलेल्या नारायणगावमार्गे मंचरला वळायचे. दुसरा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळा ओलांडून तळेगावहून आतल्या रस्त्याने राजगुरूनगर मार्गे मंचर गाठायचं. मंचर-भीमाशंकर हे अंतर साधारण 70 किमी असून मार्ग दाट जंगलाचा व निर्जन आहे.

कोकणातून भीमाशंकरला पायी जाण्याचा मुख्‍य मार्ग खांडसहून आहे. कर्जत खांडस अंतर सुमारे 14 किमी आहे. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कशेळे आहे. इथून खांडसला जायचे वळण आहे. खांडसहून भीमाशंकरचा ट्रेक साधारण अकरा किमीचा खड्या चढणीचा आहे. इथूनदेखील माथ्यावर जाणारे दोन मार्ग आहेत. दोन्ही वाटा डोंगराच्या पहिल्या पठारावर एकत्र येतात. यातील एक मार्ग ‘गणपतीघाट’ या नावाने ओळखला जातो. तर, दुसरा मार्ग शिडीचा रस्ता म्हणून डोंगर भटक्यांना परिचित आहे. या मार्गातली तीन-चार ठिकाणे अतिधोकादायक आहेत. इथे दोन ठिकाणी कपरीत शिड्या लावलेल्या आहेत. ट्रेकींगची सवय असणाऱ्यांना या साहसी मार्गानेच जायला आवडते.

(Travel Special story on Bhimashankar trek)

हेही वाचा :

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.