AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धबधब्यावर जाताना किंवा ट्रेकिंगवर जातान तंबाखू घेऊ नक्की जा, कारण जाणून आश्चर्य वाटेल

पावसाळ्यात ट्रेकिंग किंवा धबधब्यांना भेट देणं म्हणजे सर्वांचचं आवडीचं. पण तुम्हाला माहितीये का की यावेळी आपली सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची असते. त्यासाठी तंबाखू जवळ ठेवणे गरजेचे आहे. तंबाखू खाण्यासाठी नाही तर आपल्या सुरक्षेसाठी. कशी ते जाणून घेऊयात.

धबधब्यावर जाताना किंवा ट्रेकिंगवर जातान तंबाखू घेऊ नक्की जा, कारण जाणून आश्चर्य वाटेल
Protect Yourself on Treks, Using Tobacco to Repel Leech BitesImage Credit source: Meta AI
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jun 29, 2025 | 11:28 AM
Share

पावसाळा म्हटलं की सर्वाचं आवडीचं ठिकाण म्हणजे धबधबा किंवा ट्रेकिंग. अनेकजण आधीच प्लॅनिंग करतात. पण धबधबे किंवा ट्रेकिंगच्या ज्या काही जागा असतात त्या शक्यतो आड-राणावर, किंवा जिथे फार मनुष्यवस्ती नसते अशाच ठिकाणी असतात. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना, धबधब्यावर जाताना काही गोष्टी सोबत नेऊन जाणं फार गरजेचं असतं. त्यातील एक गोष्ट म्हणजे मीठ आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंबाखू. तंबाखू खाण्यासाठी नाही तर आपलं संरक्षण करण्यासाठी. होय, कसं ते पाहुयात.

या धबधब्यावर जाताना तंबाखू घेऊन जाणे गरजेचे

जसं की एका धबधब्याचं उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूरातील ते जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध असणारा धबधबा म्हणजे शाहूवाडी तालुक्यातील बर्की हा धबधबा. बर्की हा धबधबा कोल्हापूरपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. बर्की धबधब्यासाठी जंगलातून काही अंतर चालत जावे लागते. बर्की धबधब्यावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.पण, धबधब्यावर जात असताना तुमच्याकडे मीठ नाही घेऊन जाता आलं तरी तंबाखू घेऊन जाणे महत्वाचे आहे.

तंबाखू कशी ठेवेल सुरक्षीत?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तंबाखू कशासाठी हवी? या धबधब्याजवळ जात असताना जंगलातून चालत जावे लागते. जंगलातून वाटेने चालत जात असताना आपल्या शरीराला रक्त शोषणारे जळू चिकटतात.आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी जळू चिकटतो तिथे तो रक्त शोषतो. शरिरावर चिकटलेला जळू काढण्यासाठी तंबाखूचा वापर केला जातो. शरिरावर जळू चिकटल्यानंतर त्या जळूवर लगेच तंबाखू टाकल्यानंतर तो जळू शरिरावरून निघून पडतो. यासाठी तिकडे फिरायला जात अताना तंबाखू जवळ ठेवली जाते.

तंबाखूमुळे या गोष्टींपासून होईल संरक्षण  

गावाकडच्या पारंपरिक पद्धतीनुसार शरीराला जळू लागल्यास त्यावर तंबाखू टाकली जाते.तंबाखू टाकल्यानंतर जळू निघून पडतो. शरीराला चिकटणाऱ्या जाणारा जळूला मारण्यासाठी अनेकदा मीठही वापरलं जातं. जळूच्या अंगावर मीठ टाकलं, की तो लगेच मरतो. पण जर तुम्हाला मीठ घेऊन जाणे शक्य नसेल तर तंबाखू तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होईल . ती तुम्ही घेऊन जाऊ शकता. ट्रेकिंगला जातान देखील तुम्ही ही युक्ती वापरू शकता.

तबांखूमध्ये असणारे घटक….

जळूंना तंबाखूचा वास आवडत नाही. तंबाखूमध्ये असलेले काही घटक जळूंना प्रतिकारशक्ती निर्माण करतात. ज्यामुळे ते तुमच्याजवळ येत नाहीत. तुम्ही तंबाखू पाण्यात भिजवून किंवा तंबाखूची पूड तुमच्या पायांवर आणि कपड्यांवर लावू शकता. तंबाखूचा वापर करताना, तुमच्या त्वचेवर जास्त वेळ राहू नये यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

Follow Us
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!
उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट...
Big Breaking | उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट....कोल्हापुरात नेमकं काय घडलं?
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा