AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair care: नारळाचे तेल आणि लिंबाचा रस एकत्र लावा; केस लांबसडक आणि एकदम घनदाट होतील

लांबसडक, दाट केस सर्वांनाच हवे असतात. पण वाढते प्रदूषण, धावपळीची जीवनशैली यामुळे केस तुटतात, गळण्याची समस्या वाढते. घरातीलच काही गोष्टींचा वापर केल्यास केसांच्या समस्या नक्कीच दूर होतील. 

Hair care: नारळाचे तेल आणि लिंबाचा रस एकत्र लावा; केस लांबसडक आणि एकदम घनदाट होतील
| Updated on: Jul 09, 2022 | 7:24 PM
Share

घनदाट, मजबूत केस सर्वांना हवे असतात. मात्र सध्याची धावपळीची जीवनशैली, वाढते प्रदूषण (Pollution), खाण्याच्या अनियमित वेळा या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर तसेच केसांच्या आरोग्यावरही होत असतो. केसांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केस गळणे, तुटणे, कोरडे होणे, पांढरे होणे अशा अनेक समस्यांचा (Hair problems) सामना करावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी पार्लरमध्ये जाणे, स्पा किंवा इतर महागडे उपचार करणे दरवेळेस शक्य नसते. सगळ्यांकडे तितका वेळही नसतो. मात्र घरच्याघरी काही साधेसोपे उपाय करुन (Home remedies)केसांची समस्या नक्कीच सोडवता येते. रोजच्या वापरातील वस्तूंचा समावेश करून केसगळती व इतर समस्या कमी होऊ शकतात.

केसांना मालिश करण्यासाठी नारळाचे तेल आपण नेहमीच वापरतो. मात्र त्यासोबतच लिंबाच्या रसाचा उपयोग केल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. नारळाच्या तेलामुळे केसांचे पोषण होऊन त्यांची चांगली वाढ तर होतेच, पण केस तुटणे, अकाली पांढरे होणे या समस्याही दूर होतात. तसेच लिंबाच्या रसाचेही अनेक फायदे होतात. त्यामुळे नारळाचे तेल व लिंबाचा रस, या दोन्ही गोष्टी एकत्र वापरल्याने केसांसाठी उपयुक्त ठरते.

टाळूला सुटणारी खाज कमी होते

एका वाटीत 3-4 चमचे नारळाचे चमचे तेल घ्या. त्यामध्ये लिंबाचा थोडा रस मिसळा. हे मिश्रण एकत्र करून स्नान करण्यापूर्वी केसांना, विशेषत: टाळूला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. हे नियमितपणे केल्याने केसांना पोषण तर मिळतेच पण टाळूची कोरडी त्वचा मऊ होऊन सुटणारी खाजही कमी होते. परिणामी केसांतील कोंडा कमी होतो.

केस छान वाढतात

लिंबाचा रस आणि नारळाचे तेल , या दोन्हींमध्ये भरपूर पोषक गुणधर्म असतात. आपली आजी, आई लहानपणी नेहमीच आपल्याला तेलाने केसांना छान मालिश करून द्यायची. त्यमुळे केसांचे छान पोषण होऊन त्यांची वाढही चांगली होते. नारळाचे तेल आणि लिंबाच्या रसामुळे सी व डी व्हिटॅमिनची कमतरता दूर होते व केस छान वाढतात.

केस चमकदार होतात

वाढते प्रदूषण, हवेचा खालावलेला स्तर या सर्व गोष्टींचा आपल्या आरोग्याप्रमाणेच केसांवरही परिणाम होत असतो. त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. लिंबाचा रस आणि नारळाचे तेल, या दोहोंच्या मिश्रणाने केसांना छान मसाज केल्यास त्यांचे पोषण होते. केसांचा पोत सुधारतो आणि ते छान चमकदारही होतात. आठवडयातून दोन वेळा तरी हे मिश्रण केसांना नक्की लावा. थोड्याच दिवसात फरक दिसून येईल

केस पांढरे होणार नाहीत

केस पांढरे होण्याचे मुख्य कारण, म्हणजे त्यांना नीट पोषण न मिळणे. लहान वयातच अनेकांचे केस पांढरे होतात. स्ट्रेस, पुरेशी झोप न होणं किंवा हार्मोनल असंतुलन, हे केस पांढरे होण्यामागचं कारण असू शकत. नंतर ते पांढरे केस लपवण्यासाठी अनेक कृत्रिम प्रसाधनांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे केसांचे आणखीनच नुकसान होते. मात्र नारळाचे तेल आणि लिंबाच्या रसाच्या मिश्रणाने केसांना मसाज केल्यास त्यांना पुरेसं पोषण मिळतं व केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. या मिश्रणाच्या नियमित वापरानेच हा फायदा होतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.