5

Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!

हिवाळ्याच्या या मोसमात रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे होतात (Winter Diet Food).

Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 11:26 AM

मुंबई : आपल्याला नेहमी थंड हवामानात काहीतरी गरमागरम खावेसे वाटते. या मोसमात तळलेल्या पदार्थांचे सेवन देखील वाढते. ज्यामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवण्यास सुरूवात होते. हिवाळ्याच्या या मोसमात रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे होतात (Winter Diet Food). या गोष्टी दिवसभर उर्जा देतात. शिवाय शरीर उबदार व निरोगी ठेवतात आणि वजन देखील कमी करतात. चला तर, या गोष्टींबद्दल जाणून घेऊया… (Winter Diet Food should eat on empty stomach)

गरम पाणी आणि मध

थंड हवामानात, आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी आणि मधाने करा. मधामध्ये मुबलक प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स आणि एन्झाइम्स आढळतात. या गोष्टी आतड्यांना आतून स्वच्छ ठेवतात. कोमट पाण्यात मध मिसळून ते प्यायल्याने शरीरातील सर्व हानिकारक घटक बाहेर निघून जातात. याशिवाय वजन कमी करण्यासाठी देखील हे अत्यंत प्रभावी मानले जाते.

भिजलेले बदाम

भिजवलेल्या बदामांमध्ये मॅंगनीज, व्हिटामिन ई, प्रथिने, फायबर, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड असतात. बदाम नेहमी रात्री भिजवून सकाळी खावेत. बदामच्या सालांमध्ये टॅनिन असते. जे शरीरातील पोषकद्रव्ये शोषण्यास प्रतिबंधित करते. बदाम भिजल्यानंतर त्यांना सोलणेदेखील सोपे होते. बदाम शरीराला पोषक घटक देण्याबरोबरच, शरीर आतून उबदार ठेवण्याचे कामही करतात (Winter Diet Food should eat on empty stomach).

सुकामेवा / ड्रायफ्रुट्स

सकाळी नाश्त्यापूर्वी मुठभर ड्राय फ्रुट्स खाल्ल्याने पोट साफ राहते. हे केवळ पचन क्रिया सुधारत नाही तर, पोटातील पीएच पातळी संतुलित राखण्यास देखील मदत करतात. आपल्या रोजच्या आहारात मनुका, बदाम आणि पिस्ताचा समावेश करा. परंतु, या गोष्टी खाताना, त्या प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्या. नका अन्यथा शरीरावर पुरळ उठू शकते.

ओटमील

ओटमील सारखा चांगला नाश्ता दुसरा काहीही असू शकत नाही. जर आपल्याला कमी कॅलरी आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असा नाश्ता खायचा असेल तर ओट्स खाणे फायदेशीर ठरते. हे शरीरातील हानिकारक घटकांचा निचरा करते आणि आतडे निरोगी ठेवते. ओट्स खाल्ल्याने जास्त काळ भूक लागत नाही आणि वजन देखील नियंत्रणात राहते (Winter Diet Food should eat on empty stomach).

पपई

आतडे निरोगी ठेवण्याबरोबरच, पपईच्या सेवनामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. रिकाम्या पोटी खाण्यासाठी पपई ‘सुपरफूड’ मानली जाते. पपई प्रत्येक हंगामात अगदी सहज उपलब्ध होते. आपण आपल्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करून शकता. पपई कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगची समस्या दूर करते आणि वजन देखील कमी करते.

भिजवलेले अक्रोड

बदामाप्रमाणेच अक्रोड भिजवून खाणे फायद्याचे आहे. रात्री भिजवून ठेवलेले अक्रोड सकाळी सकाळी रिकाम्या पोटी खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात करा. भिजवलेल्या अक्रोडमध्ये कोरड्या अक्रोडपेक्षा जास्त पोषक घटक असतात. रात्री किमान 2-5 अक्रोड भिजत घाला आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी ते खा.

(Winter Diet Food should eat on empty stomach)

Non Stop LIVE Update
उद्योगमंत्री उद्य सामंत यांचे धक्कादायक विधान, तो एमओयु सापडत नाही
उद्योगमंत्री उद्य सामंत यांचे धक्कादायक विधान, तो एमओयु सापडत नाही
काय झाडी फेम शहाजी बापू पाटील याचं कुणाला आश्वासन? मंत्रीपद मागतो...
काय झाडी फेम शहाजी बापू पाटील याचं कुणाला आश्वासन? मंत्रीपद मागतो...
प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गात आडवे येणाते ते दोन भटजी कोण?
प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गात आडवे येणाते ते दोन भटजी कोण?
विधानसभा अध्यक्ष संतापतात तेव्हा..., म्हणाले 'मक्तेदारी चालणार नाही'
विधानसभा अध्यक्ष संतापतात तेव्हा..., म्हणाले 'मक्तेदारी चालणार नाही'
बदलापूरच्या तरुणाची 'ती' आदर्श कृती, परदेशात भारतीयांची मान उंचावली
बदलापूरच्या तरुणाची 'ती' आदर्श कृती, परदेशात भारतीयांची मान उंचावली
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?