Pandharpur Wari | आषाढी एकादशीनिमित्त मराठवाड्यातून पंढरपूरपर्यंत विशेष ट्रेन, वाचा स्पेशल ट्रेन कधी निघणार, कधी पोहोचणार?

औरंगाबाद, जालना, नांदेड या स्टेशनवरून निघाणाऱ्या गाड्यांमधून वारकरी आणि भक्तांनी योग्य वेळात पंढरपूरला पोहोचावेत, या दृष्टीने रेल्वे विभागाने काळजी घेण्यात आली आहे.

Pandharpur Wari | आषाढी एकादशीनिमित्त मराठवाड्यातून पंढरपूरपर्यंत विशेष ट्रेन, वाचा स्पेशल ट्रेन कधी निघणार, कधी पोहोचणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 3:46 PM

औरंगाबादः आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याची ओढ असंख्य भाविकांना लागली आहे. मराठवाड्यातूनही (Marathwada) अनेक भाविक पंढरपूरच्या दर्शनासाठी जात असतात. या भाविकांसाठी पंढरपूरपर्यंत विशेष रेल्वे (Special train for Pandharpur) सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूर आणि परतीसाठी विशेष गाड्या चालवल्या जातील. ही विशेष सेवा 07 जुलैपासून सुरु केली जाईल, असे रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. औरंगाबाद, जालना, नांदेड या स्टेशनवरून निघाणाऱ्या गाड्यांमधून वारकरी आणि भक्तांनी योग्य वेळात पंढरपूरला पोहोचावेत, या दृष्टीने रेल्वे विभागाने काळजी घेण्यात आली आहे. मराठवाड्यातील तीन ठिकाणांहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळा पुढीलप्रमाणे-

जालना स्टेशनवरून सुटणाऱ्या रेल्वे-

– 9 जुलै रोजी संध्याकाळी 7.20 वाजता विशेष गाडी (07468) निघेल. पंढरपूरला दुसऱ्या दिवशी ती सकाळी 6.30 वाजता पोहोचेल. हीच गाडी परतीच्या प्रवासाला 10 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता पंढरपूरवरून (07469) सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता जालन्याला पोहोचेल. या गाडीत एसी, सेकंड क्लास (स्लीपर), जनरल असे 13 डबे असतील.

औरंगाबादहून पंढरपूरकडे…

– 9 जुलै रोजी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून विशेष गाडी (07515) रात्री 9.40 वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी 11.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने ही गाडी (07516) पंढरपूर स्टेशनवरून 10 जुलै रोजी रात्री 11 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 12.20 वाजता औरंगाबादला पोहोचेल. या गाडीत सेकंड क्लास (स्लीपर) जनरल असे 17 डबे असतील.

नांदेड-पंढरपूर-नांदेड

नांदेड रेल्वे स्टेशनवरून विशेष गाडी (07498) 9 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.35 वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने ही गाडी (07499) पंढरपूर स्टेशनवरून 10 जुलै रोजी रात्री 9.21 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6.50 वाजता नांदेडला पोहोचेल. या गाडीत एसी, सेकंड क्लास (स्लीपर), जनरल असे 18 डबे असतील.

आषाढीसाठी महाप्रसादाची जय्यत तयारी

मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे पंढरपूर वारीमध्ये लाडूच्या प्रसादाची विक्री बंद होती. या वर्षी मोठ्या प्रमाणावर लाडू बनवण्यात येत आहेत. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते लाडू विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना अल्पदरात प्रसाद उपलब्ध व्हावा, यासाठी मंदिर समितीच्या वतीने लाडू प्रसाद विक्री केली जाते. नाशिक येथील यशोधरा महिला सहकारी औद्योगिक सहकारी संस्थेला लाडू प्रसाद तयार करण्याचे काम देण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.