आमचे मित्र पक्ष सत्ताधारी भाऊ हिसकून घेत असेल तर… अब्दुल सत्तार यांचा मोठा इशारा, महायुतीत..
अब्दुल सत्तार यांनी नुकताच मोठे विधान केले. अब्दुल सत्तार यांनी भाजपासोबतच्या वादावर भाष्य केले हेच नाही तर त्यांनी स्पष्ट सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला. त्यांच्यासोबत मी चर्चा केली. एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. त्यांनी आदेश दिला.

अब्दुल सत्तार आणि एकनाथ शिंदे यांच्यात साडे 3 तास बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना आता अब्दुल सत्तार यांनी म्हटले की, आम्ही सर्वांनी मिळून सत्ता आणली. पण सत्ता आल्यानंतर एकच पक्ष आपला पक्ष वळवून दुसरा पक्ष संपवत असेल तर याला कोणाला विचारण्याची गरज नाही. मला स्पष्ट बोलायचे आहे की, मी माझ्या नेत्याला ही सर्व माहिती तंतोतंत दिली. मी काही भारतीय जनता पार्टीच्या देशाच्या किंवा राज्याच्या नेत्यांबद्दल बोललो नाही पण मी आमच्या जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्ह्यामध्ये आम्हाला जी वागणूक देऊ लागले ही वागणूक सत्ताधारीपेक्षा विरोधीपेक्षाही वाईट परिस्थिती निर्माण केली, याच्याबद्दल आम्ही बोललो. आम्ही आमच्या नेत्याकडे सर्व भावना मांडल्या. आता त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते बोलतील.
यांच्यामध्ये बोलणे झाल्यानंतर यामधून दोन्ही नेते मार्ग काढतील. मुख्यमंत्र्यांचे आणि माझे फोनवर बोलणे झाले. त्यांनी मला सांगितले की, अर्ज माघारी घ्या, अर्ज भरू नका. शेवटी त्यांची जबाबदारी आहे, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी फोनवर बोलल्यानंतर आमच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिला. त्यानंतर मी कार्यकर्त्यांना बोलून घेईल आणि अर्ज मागे घ्यायला लावेल. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत, त्यांनी आदेश दिल्यानंतर करावे लागले.
मुख्यमंत्रीही माझ्याशी फोनवर बोलले. मी आमच्या कार्यकर्त्यांना बोलून घेईल आणि अर्ज मागे घेण्याकरिता सांगेल. ही निवडणूक लढताना अनेकांनी आमच्यासोबत संपर्क केला होता. आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ती उमेदवारी जर मागे घेतली तर नाराजीचा सूर राहत नाही. युतीचा धर्म पाळा असा सल्ला एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आला. विषय पाठिंब्याचा नाहीये. पक्ष संपवणे, शिवसेनेला नुकसान होऊ नये, शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांनी स्थापनेपासून ते आजपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्हा जो आहे तो त्याची इतकी वाईट परिस्थिती कधी झाली नव्हती ती आता होऊ लागली.
आधी आम्ही एक नंबरला होतो. आता दोन नंबरला आहोत. आमचे फिगर कमी झाले. आमची पहिले जिल्हा परिषद गेली. महापालिका गेली, आज विधान परिषद गेली. असे टप्प्या टप्प्याने आमच्याकडूनच आमचे मित्र पक्ष सत्ताधारी भाऊ हिसकून घेत असेल तर त्याच्यावर चिंतन करणे, आजपासून पुढच्या येणाऱ्या अडचणीच्या तयारीला लागणे हे आमचे काम आहे आणि ते आम्ही केले. पक्ष संपू नये, पक्षाचे नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. पुढे अब्दुल सत्तार यांनी म्हटले की,