AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी खूप फिरले, घराकडे परतणार तितक्यात… पुण्यातील 10 दोस्तांबाबत अघटीत घडलं; काळजाचा ठोकाच चुकला

Accident : दोन कार घेऊन पुण्यातील 10 मित्रांचा एक ग्रुप लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरला फिरायला गेला होता. मात्र या मित्रांसोबत भयंकर घडलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आधी खूप फिरले, घराकडे परतणार तितक्यात... पुण्यातील 10 दोस्तांबाबत अघटीत घडलं; काळजाचा ठोकाच चुकला
accident KotaImage Credit source: Google
| Updated on: Mar 18, 2026 | 6:46 PM
Share

राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक फॉर्च्युनर कार हायवेवरून सुमारे 30 फूट खाली कोसळली. या अपघातात कार 3 जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दोन कार घेऊन पुण्यातील 10 मित्रांचा एक ग्रुप लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरला फिरायला गेला होता. यानंतर घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

अपघातात तिघांचा मृत्यू

पुण्याच्या मित्रांचा हा अपघात कोटा जिल्ह्यातील कैथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत, बालापुरा आणि कराडिया यांच्या दरम्यान झाला. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कैथून पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज सिकरवार यांनी सांगितले की, 10 मित्रांचा गट 26 फेब्रुवारीला सहलीसाठी निघाला होता. लेह-लडाख आणि जम्मू-कश्मीर येथे फिरून हे सर्वजण दोन कारद्वारे पुण्याकडे परतत होते. फॉर्च्युनर कार चालवणाऱ्या चालकाला डुलकी लागल्यामुळे गाडी आधी डिव्हायडरला धडकली त्यानंतर हा भीषण अपघात झाला.

कार 30 फूट खाली कोसळली

समोर आलेल्या माहितीनुसार, फॉर्च्युनर कार डिव्हायडरला धडकल्यानंतर हायवेच्या कडेला 30 फूट खाली कोसळली. या कारमध्ये 3 मित्र होते तर मागील गाडीत 7 मित्र होते. या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अपघातानंतर इतर मित्र जखमी मित्रांच्या मदतीसाठी धावले. स्थानिक लोकांच्या मदतीने तिघांना कारमधून बाहेर काढले आणि कैथून सीएचसीमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतांमध्ये सिद्धांत (21), कुणाल (25) आणि मयूरेवा (23) यांचा समावेश असून हे तिघेची चांगले मित्र होते.

कुटुंब आल्यानंतर पोस्टमार्टम होणार

या अपघातातील मृतांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमगृहात पाठवले आहेत. मृतांचे नातेवाईक आल्यानंतर पोस्टमार्टम करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सीएचसी प्रभारी डॉ. राजेश सामर यांनी सांगितले की, ‘रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता.’ दरम्यान, या अपघातानंतर इतर 7 मित्रांसह मृतांच्या कुटुंबीयांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.