AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जाणीवपूर्वक अशी कारवाई करता येत नाही”; राहुल गांधी यांच्या कारवाईवरून भाजप नेत्यानं स्पष्टच सांगितलं…

लोकशाहीमध्ये विरोधीपक्ष मजबूत पाहिजे.मात्र आता पक्षही मजबूत नाही आणि नेताही मजबूत नाही अशी अवस्था झाली असल्याची टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे.

जाणीवपूर्वक अशी कारवाई करता येत नाही; राहुल गांधी यांच्या कारवाईवरून भाजप नेत्यानं स्पष्टच सांगितलं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 25, 2023 | 6:45 PM
Share

सिंधुदुर्ग : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदरकी रद्द झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेसबरोबरच आता भाजपने ओबीसीचे कार्ड बाहेर काढून ओबीसी समजाचा अपमान झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभर आता आता राहुल गांधी यांच्या समर्थनाथ आणि विरोधात जोरदार आवाज उठवला जात आहे. तर दुसरीकडे भाजपमधून आता राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता.

तर आज भाजपचे नेते विनोद तावडे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असून राहुल गांधी यांना ते शोभणारं आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तर राहुल गांधी यांना शिक्षा जाहीर होताच ही कारवाई कायदेशीर कारवाई झाल्याचे सांगत राहुल गांधी यांना झालेली शिक्षा आणि त्यांचे गेलेली खासदारकीचेही विनोद तावडे यांनी समर्थन केले आहे.

भाजपचे नेते विनोद तावडे यांनी काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून त्यांनी महाविकास आघाडीला छेडले आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या पहाटेच्या शपथविधी नंतर जर सरकार स्थापन झालं असतं तर आम्ही राष्ट्रवादीला आमच्या भूमिकेवर आणलं असतं.

मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादीची भूमिका सोडून काँग्रेसची भूमिका स्वीकारली.सरकार बनल्यानंतर आपल्या अजेंड्यावर सहकाऱ्यांना आणण महत्वाचं असतं मात्र खुर्चीसाठी फरफटत जाण चांगलं नसतं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळी काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्षांसाठी मतदानापासून वंचित ठेवलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय बोलली होती त्याची आता आठवण करून देणं गरजेचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर साऱ्या देशातून भाजपवर टीका केली जात आहे. त्यावर बोलतानाही त्यांनी सांगितले की, मोदी सरकार घटनेप्रमाणे वागत नाही असं एकीकडे बोलायचं,आणि घटनेप्रमाणे आणि कायद्याने कारवाई केली तर हे कसं काय केलं अस दुटप्पीपणाने बोलायचं अशी नीती काँग्रेसची आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

त्यामुळे कोणावरही जाणीवपूर्वक अशी कारवाई करता येत नाही. त्याचबरोबर ओबीसी समाजाचा राहुल गांधी यांनी अपमान केला आहे.

त्यांना हे शोभत का? माझं आडनाव सावरकर नसून गांधी आहे त्यामुळे मी माफी मागणार नाही….हे राहुल गांधींचे वाक्य कोकणवासीयांना पटणार नाही असंह त्यांनी यावेळी सांगितले.मात्र हे दुर्दैवी आहे.

लोकशाहीमध्ये विरोधीपक्ष मजबूत पाहिजे.मात्र आता पक्षही मजबूत नाही आणि नेताही मजबूत नाही अशी अवस्था झाली असल्याची टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार