AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोकड बळीची बंदी उठली, तब्बल पाच वर्षांनी ‘इथे’ दिला जाणार बोकड बळी…

गडावर्ण दसऱ्याला बोकडबळी देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. आदिवासी बांधवाच्या सानिध्यात श्री सप्तशृंगी मातेचे स्थान असल्याने ते हा विधी करत असतात.

बोकड बळीची बंदी उठली, तब्बल पाच वर्षांनी 'इथे' दिला जाणार बोकड बळी...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Sep 29, 2022 | 4:18 PM
Share

नाशिक : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंग गडावर (Saptashrungi Temple) पाच वर्षांपूर्वी बोकड बळीच्या परंपरेवर बंदी घालण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांनी ही बंदी घातली होती. याच बंदी च्या विरोधात सुरगाणा (Surgana) तालुक्यातील धोडांबे येथील आदिवासी विकास संस्थेने जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयात (Court) धाव घेतली होती. आज त्यावर सुनावणी होऊन आदिवासी विकास संस्थेच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे. न्यायालयाने बंदी उठवल्याने यंदाच्या वर्षी सप्तशृंग गडावर यंदा बोकड बळीचा विधी होणार आहे. एकूणच या निर्णयाने आदिवासी बांधवांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असून यंदाच्या वर्षी पाच वर्षाच्या खंडानंतर होणारा बोकड बळीचा विधी उत्साहात साजरा होणार आहे.

2019 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात आज गुरुवारी याबाबत सुनावणी पार पडली आहे.

न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिल असून अटी शर्तीनूसार बोकड बळी देण्याची प्रथा परंपरा पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

सप्तशृंगी गडावर दसऱ्याच्या दिवशी श्री भगवतीच्या मंदीर पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर प्रथेनुसार बोकड बळी देण्याची परंपरा आहे.

अॅड . दत्ता पवार यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली आहे. यासाठी न्यायालयीन लढाईसाठी नांदुरी गावातील ग्रामस्थ, सप्तशृंगी गडावरील भाविकांनी पाठपुरावा केला होता.

11 सप्टेंबर 2016 ला दसऱ्याच्या दिवशी बोकड बळी देण्याचा विधी सुरू असतांना सुरक्षा रक्षकाकडून अनावधानाने रायफलमधून गोळी सुटली होती.

त्यानंतर भिंतीवर टी गोळी जाऊन आदळली होती त्यानंतर छरे भाविकांना लागल्याने 12 भाविक किरकोळ जखमी झाले होते.

यानंतर पोलीस प्रशासनाने याबाबतचा अहवाल प्रशासनाला दिला होता त्यानंतर बोकड बळीचा विधी वर बंदी घालण्यात आली होती.

गडावर्ण दसऱ्याला बोकडबळी देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. आदिवासी बांधवाच्या सानिध्यात श्री सप्तशृंगी मातेचे स्थान असल्याने ते हा विधी करत असतात.

यामध्ये लोकभावना आणि श्रद्धा असल्याने बोकड बळी दिला नाहीतर गडावर आपत्ती कोसळत असते असा समज आहे.

यामध्ये दरड कोसळणे, अतिवृष्टी या सारख्या नैसर्गिक आपत्ती येवून दुर्घटना होवू शकतात असा समज येथील भविकांसह नागरिकांचा आहे.

Follow Us
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
मोठी ब्रेकिंग! महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule | घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल