AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Violence : नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा पोलिसांना महत्त्वाचा आदेश

Nagpur Violence : नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन हा सर्व राडा झाला. वाहनांची तोडफोड, वाहनं पेटवून देणं, दगडफेक अशा घटना घडल्या. नागपूरमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे.

Nagpur Violence :  नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा पोलिसांना महत्त्वाचा आदेश
Devendra Fadnavis Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 18, 2025 | 7:56 AM
Share

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला काल हिंसक वळण लागलं. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री याच मुद्यावरुन दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले. अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेक करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना पोलीसही जखमी झाले. दगडफेकीच्या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले. कालच्या घटनेनंतर नागपुरात आता तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेला शांतता बाळगण्याच आवाहन केलं आहे. “नागपूरच्या महाल भागात जी काही घटना घडलेली आहे, ती अतिशय अयोग्य आहे. अशा प्रकारे जमाव जमा होऊन दग़डफेक होणं अत्यंत चुकीच आहे. माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की, सर्वांना कायदा-सुव्यवस्थेच पालन करावं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “नागपूर शहर हे एकोप्याने रहाणार शहर आहे. त्यामुळे कोणीही शांतता भंग करु नये. मी स्वत: परिस्थितीवर पूर्ण नजर ठेऊन आहे” असं त्यांनी सांगितलं. “मी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलय, जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल ते अत्यंत गांर्भाीयने घेतलं जाईल. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी शांतता ठेवावी” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

नागपूर शहरात कलम 144

नागपूर शहरात कलम 144 लागू केल्याची पोलिसांनी माहिती दिली. नागपूरचे भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी बाहेरून आलेल्यांनीच घरेदारे पेटवल्याचा आरोप केला आहे. नागपूरच्या महाल भागात काल समाजकंटक बेभान झाले होते. रस्त्यावरील दिसेल ती गाडी फोडली. चारचाकी आणि दुचाकी वाहने पेटवली. त्यानंतर काही लोकांनी जेसीबी वाहन पेटवून दिलं. त्यामुळे आगीचा एकच भडका उडाल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.