AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीवर शिक्का मोर्तब होताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र, जल्लोषा दरम्यान कसं होतं चित्र ?

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असलेले प्रकाश आंबेडकर हे एकत्र आल्याने राज्यात एक मोठी राजकीय ताकद निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीवर शिक्का मोर्तब होताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र, जल्लोषा दरम्यान कसं होतं चित्र ?
Image Credit source: Google
| Updated on: Jan 23, 2023 | 4:51 PM
Share

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होईल अशी चर्चा होती. आज अखेर मुंबईत या युतीवर शिक्का मोर्तब झाला आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवन येथे पत्रकार परिषद घेत युती केल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील या युतीवर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतांना नाशिकमध्ये मात्र शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून हा आनंद साजरा केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत हा आनंद साजरा केला आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी पदाधिकऱ्यांनी मात्र भविष्यात काय होणार याबाबतही स्पष्टच सांगून टाकलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असलेले प्रकाश आंबेडकर हे एकत्र आल्याने राज्यात एक मोठी राजकीय ताकद निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

भाजपसह शिंदे गटाला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी मोठी ताकद निर्माण झाली आहे. देशात एक मोठी शक्ती निर्माण झाली असून देशामध्ये देखील नवीन इतिहास घडणार असल्याची भावना वंचितचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे यांनीही यावेळी नाशिक महानगर पालिकेत सत्तांतर होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती इतिहास घडवेल असं मात मांडलं आहे.

ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात युतीच्या घोषणा झाल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्ते लागलीच एकत्र एकूण जल्लोष साजरा करू लागले आहे. आगामी महानगर पालिका आणि इतर निवडणुकीबाबतही भाष्य करू लागले आहे.

पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात नव्या युतीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असतांना नाशिकच्या थंडीतही शिवशक्ती आणि भीमशक्ती जल्लोष होऊ लागल्याने आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.