AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषीमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोकाटे?

नंदुरबार दौऱ्यावर असताना सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कृषीमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोकाटे?
| Updated on: Apr 06, 2025 | 9:13 PM
Share

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरवला आहे. पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पाहाणी दौरा कृषीमंत्र्यांकडून सुरू आहे. दरम्यान नंदुरबार दौऱ्यावर असताना सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडला आहे, मात्र त्यामुळे बाकीच्या योजना बंदी पडतील असं काही होणार नाही, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकार सर्वांना बरोबरीनं घेऊन चाललं आहे. सर्वांना न्याय देणार आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं, मात्र अजूनही आकडेवारी आलेली नाहीये. राज्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील. पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार आहे, यावेळी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी उशीर होणार नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षांकडे कमी आमदार असल्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेताही नेमता येत नाहीये. भविष्यातील काळ हा विरोधकांसाठी अवघड आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. दरम्यान वक्फ सुधारना विधेयकाला लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. मात्र त्यानंतर विरोधकांकडून आता सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे.  मुस्लिमांच्या जमिनीनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनीवर सरकारचं लक्ष असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

विरोधकांच्या या टीकेला देखील यावेळी माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षांच्या लोकांकडे काही काम उरलेलं नाही, त्यामुळे ते मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या जमिनीचा विषय काढत आहेत. दोन जातींमध्ये भांडण लावण्याचं काम विरोधक करत आहेत, असं यावेळी माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....