AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत श्रीलंका कसोटी सामना निर्णायक स्थितीत, जय पराजयानंतर WTC 2027 गुणतालिकेत असा पडेल फरक

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना निर्णायक स्थितीत आला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून श्रीलंकेला अजून 288 धावा करायच्या आहेत. या सामन्याच्या निकालाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात...

भारत श्रीलंका कसोटी सामना निर्णायक स्थितीत, जय पराजयानंतर WTC 2027 गुणतालिकेत असा पडेल फरक
भारत श्रीलंका कसोटी सामना निर्णायक स्थितीत, जय पराजयानंतर WTC 2027 गुणतालिकेत असा पडेल फरकImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 18, 2026 | 6:43 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. पाचव्या दिवशी 90 षटकांचा खेळ होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे विजयाची संधी आहे. भारताने चौथ्या दिवशी 193 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह 371 धावा ठेवल्या. आता श्रीलंकेला विजयासाठी 372 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. त्यात श्रीलंकेने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 4 गडी गमवून 84 धावा केल्या आहेत. श्रीलंकेला विजयासाठी अजून 288 धावा, तर भारताला 6 विकेट्सची गरज आहे. खरं तर ही खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या सत्रातच श्रीलंकेला रोखून सामना जिंकेल अशी स्थिती आहे. पण क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. त्यामुळे सामन्याचा निकाल हा जय पराजयाने ठरणार आहे. त्याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 गुणतालिकेवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारत कुठे?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 77.78 विजयी टक्केवारीसह पहिल्या, दक्षिण अफ्रिका 75 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या, न्यूझीलंड 72.22 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या आणि बांग्लादेश 66.67 विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 गुणतालिकेत भारतीय संघ 48.12 विजयी टक्केवारीसह पाचव्या, तर श्रीलंकन संघ 41.67 विजयी टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यातील निकालाचा हमखास परिणाम गुणतालिकेत दिसून येईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी या सामन्यातील निकाल महत्त्वाचा आहे.

भारताने सामना जिंकला तर काय?

श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने जिंकला तर क्रमवारीत फार काही फरक पडणार नाही. भारतीय संघ पाचव्या स्थानावरच राहील. पण विजयी टक्केवारी कमालीची सुधारणार आहे. 48.12 टक्क्यांवरून थेट 53.55 टक्के होईल. तर श्रीलंकन संघही सहाव्या स्थानावरच राहिल, पण टक्केवारीत घसरण होईल. श्रीलंकन संघ सध्या 41.67 टक्क्यांवर आहे. त्यात घसरण होऊन 33.33 टक्के होईल.

भारताने सामना गमावला तर…

भारताने हा सामना गमावला तर मोठा फटका बसणार आहे. थेट गुणतालिकेत उलथापालथ होईल. श्रीलंकेची विजयी टक्केवारी 53.33 टक्के होईल आणि पाचव्या स्थानावर विराजमान होईल. तर भारताच्या टक्केवारीत घसरण होत 43.33 टक्के होईल आणि सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागेल. त्यामुळे आता पाचव्या दिवशी काय निकाल लागतो याकडे लक्ष लागून आहे.

Follow Us
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान