नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादात; आंदोलक थेट रस्त्यावर उतरले, काय आहे संपूर्ण प्रकरण?
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकल्पाचा मार्ग बदलण्यावरून आंदोलन पेटलं आहे.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग वादात सापडला आहे. या रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्गात बदल केल्याने अहिल्यानगरकरांनी विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलनाला नारा पुकारण्यात आला आहे. नाशिक-पुणे रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखानुसार करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिकमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले.
नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून आंमदोलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक-पुणे मार्गावरील आंदोलनामुळे वाहतूक कोडींच्या त्रासाला वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे. तर नाशिक-पुणे रेल्वेसाठी सिन्नर-संगमनेर चाकणमध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात आलं. या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. एकाच हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामुळे वाहतुक विस्कळीत झाली आहे. या आंदोलकांचा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
केंद्र सरकार नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे नारायणगावाचा जागतिक दर्जाचा कमी फ्रिक्वेन्सी रेडिओ दुर्बिह समूह धोक्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे रेल्वे प्रकल्पाचा विरोध केला जात आहे. या विरोधामुळे या मार्गात बदल किंवा भूमिगत मार्गाची आखणी तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? याचा अभ्यास केला जात आहे. या अभ्यासासाठी अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचसोबत समितीत रेल्वे बोर्डाचे विवेक गुप्ता, पुणे, नाशिक विभागाचे आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करावा लागणार असल्याची माहिती हाती आली आहे.
पुणे-नाशिक हायस्पीडचा मार्ग कसा बदलला?
या हायस्पीड रेल्वेचा पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक असा मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांसह संगमनेर आणि सिन्नर परिसरात नाराजी आहे. नागरिकांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने नाशिक-शिर्डी-पुणतांबा, अहिल्यानगर-चाकण या पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केलंय. या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूळ मार्ग कायम ठेवावा, या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे.
आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
या प्रकल्पाच्या मार्गाला विरोध म्हणून हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहे. या आंदोलनात सत्यजीत तांबे आणि राजाभाऊ वाजे देखील उतरले आहेत. या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट पाहायला मिळाली. पोलिसांनी आंदोलकांना समृद्धी मार्गावर जाण्यापासून रोखलं. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे.
