AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगर लोकसभा मतमोजणीत मोठा ट्वीस्ट, सुजय विखेंची ‘ती’ मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य

सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रार केली होती. आता या तक्रारीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर लोकसभा मतमोजणीत मोठा ट्वीस्ट, सुजय विखेंची 'ती' मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य
| Updated on: Jul 17, 2024 | 3:43 PM
Share

Ahmednagar Loksabha 2024 : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि माजी लोकसभा खासदार सुजय विखे पाटील यांनी मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. यामुळे त्यांनी काही केंद्रांवरील मतांची पुन्हा मोजणी करावी, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. आता याप्रकरणी निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना दिली आहे. सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या 40 मतदान केंद्रांवर मॉकपोल घ्यावा, अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक आयोगाला केली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना जोरदार धक्का बसला. यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. या मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे पाटील यांना तिकीट देण्यात आलं होत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने निलेश लंकेंना उमेदवारी दिली होती. यात निलेश लंकेंनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. यानंतर सुजय विखे पाटील यांनी मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता.

याप्रकरणी सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रार केली होती. आता या तक्रारीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आक्षेप घेण्यात आलेल्या या ४० मतदान केंद्रांवर मॉकपोल घ्या, अशी सूचना जिल्हा निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. त्यामुळे आता आक्षेप घेण्यात आलेल्या बुथवरील ईव्हीएमची मेमरी रिकामी करुन मतांची पडताळणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्देशांमुळे सुजय विखेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

कसा होणार मॉकपोल?

आक्षेप घेण्यात आलेल्या 40 ईव्हीएम मशिनची मेमरी रिकामी केली जाणार आहे. यात एका मशिनमध्ये प्रत्येकी 1 ते 1400 मतं टाकता येणार आहेत. यात किती मतं द्यायची हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना असणार आहे. यावेळी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममशिनवरील मतांची पडताळणी होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. आता ही प्रक्रिया नेमकी कधी पार पडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.