AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार गट पक्षाचं कोणतं नाव स्विकारणार?; जयंत पाटलांना भरसभेत सांगितलं…

Jayant Patil on Election Commission Decision about NCP Symbol and Name : जयंत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा पण स्वपक्षाच्या युवा आमदारांचं तोंडभरून कौतुक... निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

शरद पवार गट पक्षाचं कोणतं नाव स्विकारणार?; जयंत पाटलांना भरसभेत सांगितलं...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Feb 07, 2024 | 3:24 PM
Share

कुणाल जायकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, अहमदनगर | 07 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्रात मराठी माणसांनी निर्माण केलेले दोन पक्ष फोडले. आता लोक म्हणतात उरलेल्या पक्षाचं काही होऊ शकतं. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्व कष्टाने पक्ष स्थापन केले. हे दोन्ही पक्ष फोडण्याचं काम झालं. आमदारांना बाजूला करायचे काम झालं. स्वतः च्या ताकदीवर पक्ष काढायचा याची चर्चा झाली नाही. मात्र सरकार यंत्रणानी पक्ष फोडण्यास मदत केली. भारतीय लोकशाहीची घंटा वाजायला सुरवात झाली आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार गटाच्या नावाची घोषणा कधी होणार?

रोहित पवारांनी विशेष लक्ष घालून काम केलं. आज तुमच्या पदाची घोषणा केली. मात्र कोणत्या पक्षाचे हे सांगू शकलो नाही. लवकरच पक्षाची नावाची घोषणा होईल. आज आपण पद घेतले त्याला पवार साहेबांना साजेसं नाव पक्षाला मिळेल. तुम्हांला चिंता करायचे काम नाही रोहित पवार खणखणीत नाणं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

उल्हासनगरमधील गोळीबारावर पाटील म्हणाले…

ही लढाई खूप मोठी आणि लांबची आहे. पूर्वी लोकांना पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ येत नव्हती. आज पोलीस ठण्यात गोळीबार होतो. त्याच्यावर उपचार सुरु आहे. मात्र काय झालं? हे अद्याप सांगितलेलं नाही. जमिनी हडप करणं, जमिनी विकणं, परवानगी न घेणं हे प्रकार ठाण्यात घडतं आहेत. एक आमदाराने गोळीबार केला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत आहे. तर त्याची चौकशी झाली पाहिजे. मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले. मात्र त्यांच्या हातात काही नाही, असा घणाघात जयंत पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्राचा बिहार झाला आहे! सध्या बिहारमध्येही असं होत नाही. एक आमदार म्हटले छगन भुजबळ यांच्या पेकाटात लाथ मारून बाहेर काढा असेल म्हटले मात्र त्याला कोणी तंबी दिली नाही. आता आमदार सांभाळताना नाकी नऊ येत आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी उल्हासनगरमधील गोळीबारावर प्रतिक्रिया दिली आहे.

आरक्षणावर जयंत पाटील म्हणाले…

मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. ओबीसी आरक्षणावर कोणी बोलत नाही. धनगर आरक्षणच काय झालं? सामाजिक अस्थिरता निर्माण झालीये. या सर्व गोष्टीला सरकारचा पाठिंबा आहे. असं चित्र आम्ही 40 वर्षांत पहिलेलं नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं?
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?